शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मेहकर तालुक्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 01:36 IST

मेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत  तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला आले आहे.

ठळक मुद्दे२३ गावांत विहिरींचे अधिग्रहण तीन गावांत टँकरचे प्रस्ताव 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून, कडक ऊन तापायला सुरुवात झाली आहे. परिणामी, मेहकर तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू आहे. आतापर्यंत  तालुक्यातील २३ गावांत विहीर अधिग्रहणचे तर तीन गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीला आले आहे.दरवर्षी मेहकर तालुक्यात जवळपास ६० ते ६५  गावांत पाणी टंचाई निर्माण होत असते. या पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून पाणी टंचाईचा संभाव्य कृती आराखडा तयार करण्यात येतो. दरम्यान, जानेवारी महिन्यापासूनच अनेक गावांत पाणी टंचाई जाणवत होती, तर मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत सुकळी, लोणी काळे, बारडा, निंबा, उकळी, पारडी, सुळा, परतापूर, गणपूर, जौताळा, नागझरी बु., मोळा, दादुलगव्हाण, बरटाळा, विश्वी, शहापूर, नायगाव देशमुख, शिवपुरी, चिंचोली बोरे, वरवंड, पार्डी, पांगरखेड, लावणा इत्यादी गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून, या गावातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव व दृग्रबोरी, वरवंड, पारडी या गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीला प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. यामध्ये काही प्रस्ताव महसूल विभाग मेहकर तर काही प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांतील  महिला पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ज्या गावात पाणी टंचाई जाणवत असेल, त्या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जे प्रस्ताव संबंधित विभागाकडे आले असतील, ते प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. 

टॅग्स :MehkarमेहकरWaterपाणी