शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? गैरहजर कर्मचाऱ्याने आवाज देत मारल्या कार्यालयाच्या चकरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:00 IST

‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते.

मेहकर -  ‘अहो, इकडे साहेब आहेत का, साहेब’? असा आवाज मेहकर तहसील कार्यालय परिसरात बराच वेळ घुमला. त्यामुळे या आवाजाकडे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागातील कनिष्ठ लिपिक कधीच जागेवर राहत नसल्यामुळे  त्रस्त झालेल्या एका नागरिकाने बुधवारी त्या कर्मचा-याच्या टेबलवरील नावाची पाटी चक्क डोक्यावर घेऊन कर्मचा-यांच्या नावाने आवाज देत देत संपूर्ण तहसीलला चकरा मारल्या. मेहकर तहसीलमध्ये दररोज असंख्य नागरिक आपल्या महसूलच्या कामानिमित्त येत असतात. यामध्ये महिला, पुरुष, तरुण वर्गासह वृद्धांचा सुद्धा समावेश असतो. शेतीशी निगडीत कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार, फेरफार उतारा यासारख्या असंख्य कामासाठी नागरिक येत असतात.  अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित राहत नसतील तर अनेक कामांचा खोळंबा होतो. कर्मचाºयांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता, पाच मिनिट बसा आलोच, अशी उत्तरे दिली जातात. नागरिकांना मात्र यामध्ये ताटकळत बसावे लागते. मेहकर तहसील कार्यालयात सारशिव येथील मनीष दादाराव जाधव हे निवेदन देण्यासाठी आवक-जावक विभागात दोन तासापासून कनिष्ठ लिपिक  आर. व्ही. शिंदे यांच्या कक्षात बसले होते.  मात्र शिंदे यांचा कुठेच पत्ता नव्हता. इतर विभागाचे कर्मचारी सुद्धा आवक-जावक विभागात पत्रव्यवहार देण्यासाठी येत होते. ते सुद्धा तसेच रिकाम्या हाताने परत जात होते.आजूबाजूला चौकशी केली असता शिंदे आता येतीलच असे उत्तर त्यांना देण्यात येत होते. शेवटी कंटाळून मनीष जाधव यांनी शिंदे यांच्या टेबलवर असलेली त्यांच्या नावाची पाटी चक्क डोक्यावर घेऊन इकडे ‘शिंदे साहेब आहेत का हो शिंदे साहेब’? असा आवाज देत संपूर्ण तहसीलमध्ये फेºया मारल्या. या प्रकाराने उपस्थित नागरिकांमध्ये एकच हश्शा पिकला होता. मात्र अशा कर्मचाºयांविरुद्ध अनेक जणांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात कनिष्ठ लिपिक  आर. व्ही. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.  विभाग प्रमुखांनी द्यावे लक्ष कर्मचाºयांवर विभाग प्रमुखांचे नियंत्रण हवे. तहसीलमधील आवक-जावक विभागाचा कर्मचारी जर  गैरहजर राहत असेल तर त्या कर्मचाºयांविरुद्ध विभाग प्रमुखांनी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. कर्मचारी रजेवर असेल तर आवक-जावक विभागात दुसºया कर्मचाºयाची तात्पुरती नेमणूक करणे हे विभाग प्रमुखाचे काम आहे. मात्र या दोन पैकी कुठलाही प्रकार या ठिकाणी आढळून आलेला नाही.

टॅग्स :MehkarमेहकरbuldhanaबुलडाणाGovernmentसरकार