शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

 बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शिक्षक होणार अतिरीक्त     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 12:27 IST

जिल्ह्यातील पाचवीचे वर्ग आता जिल्हा परिषद शाळेच्या चवथ्या वर्गाला जोडण्यात येणार आहेत.

- संदीप वानखडे

बुलडाणा: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार केंद्राने नविन नियम जारी केले असून त्यानुसार जिल्ह्यातील पाचवीचे वर्ग आता जिल्हा परिषद शाळेच्या चवथ्या वर्गाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अतिरीक्तची टांगती तलवार आहे. या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. याविषयीचे आदेश शासनाच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार शाळांची प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशी संरचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी असे गट तयार करण्यात आले आहेत. नविन नियमानुसार विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण एक किमीच्या आत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चवथीपर्यंतच्या शाळेला पाच ते दहावीपर्यंत असलेल्या खासगी अनुदानीत, विनाअनुदानीत शाळेचा पाचवा वर्ग जोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार पाचवीचा वर्ग जोडण्याची प्रक्रीया शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसात ही प्रक्र ीया पूर्ण होणार असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी सांगितले. माध्यमिक शाळांचा पाचवा वर्ग कमी केल्यामुळे त्या शाळेतील अनेक शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. जिल्हा परिषद शाळांचे अनेक शिक्षक आधीच अतिरीक्त ठरलेले असून त्यांचे समायोजन अजुनही झालेले नाही. त्यामुळे नव्याने अतिरीक्त ठरणाºया शिक्षकांचे समायोजन कसे करणार असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. या निर्णयाला जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. 

शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. आधीच अनेक शिक्षक अतिरीक्त असताना या शिक्षकांचे समायोजन करण्याची नविन समस्या निर्माण होणार आहे. अनेक शिक्षकांची नोकरी जाण्याची भिती आहे. शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. हा निर्णय शासनाने मागे घ्यावा. - शिवराम बावस्कर, जिल्हाध्यक्ष विजुक्टा 

चवथ्या वर्गाला पाचवीचे वर्ग जोडण्याविषयीचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येत असून येत्या ८ ते १६ ही प्रक्रीया पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रक्रीयेंतर्गत अतिरीक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. - डॉ.श्रीराम पानझाडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक बुलडाणा  शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरीक्त ठरणार आहेत. जिल्हा परिषद शाळांचे आधीच अनेक शिक्षक अतिरीक्त असताना या शिक्षकांचे समायोजन न झाल्यास त्यांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शिक्षकांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हा आदेश मागे घेण्याची गरज आहे. - शेखर भोयर, शिक्षक महासंघ, संस्थापक अध्यक्ष

शिक्षकांचे समायोजन करण्याची समस्या पाचवीचे वर्ग माध्यमिक शाळांना जोडल्यानंतर अतिरीक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याची समस्या शासनासमोर निर्माण होणार आहे. आधीच अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झालेले नसताना त्यात आणखी भर पडणार आहे. त्यामुळे, शिक्षकांचे समायोजन करण्याची नविन समस्या शासनासमोर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच समायोजीत शिक्षकांना कार्यभार मिळेलच याची शाश्वती नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक