शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

कर्जमुक्तीपासून अनेक शेतकरी राहणार वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:06 IST

३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकºयांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

- अझहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे. अटी, निकष तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा केली. यात शेतकºयांना २ लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. थकित कर्जदारांची यादी बँकांना देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. परंतु आता ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे. शासनस्तरावरून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ संदर्भातील अध्यादेश शासनाने काढला.दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर दोन लाखांपेक्षा एक रूपयाही अतिरिक्त कर्ज असल्यास तो शेतकरी या योजनेस पात्र ठरणार नाही. दोन लाखाच्या वर थकित कर्ज असलेल्या शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतु त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने त्यांची कर्जमुक्ती होणार नाही. या योजनेअंतर्गत ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्ज खात्याचं व्याज आणि थकबाकी ही २ लाखांपर्यंत असावी, अशी अट घालण्यात आली आहे.तसेच अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकºयांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. एप्रिल २०१५ पुर्वीचे कर्ज असलेला शेतकरीही या योजनेस पात्र राहणार नाही.२०१३-१४ मधील बहुसंख्य थकीत कर्जदारांनी शासनाच्या आदेशानुसार २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन केले, अशा शेतकºयांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला. कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसाठी तत्कालीन सरकारने मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या थकीत कर्जदार शेतकºयांना दिलासा देत थकित कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले.जुलै ते ३० सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कर्जाचे पुनर्गठन केले. यात सर्व शेतकºयांनी २०१८ पूर्वी बँकांकडून कर्ज घेतले होते. गत वर्षी कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व २०१८ पूर्वी थकीत असलेल्या कर्जदारांचे पुनर्गठन करण्याचे आदेश फडणवीस सरकारने दिले होते. ३१ मार्च ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत बँकांनी शेतकºयांनी कर्ज व पुनर्गठण अर्ज स्वीकारून त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण होणार आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरFarmerशेतकरी