शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

कर्जमुक्तीपासून अनेक शेतकरी राहणार वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:06 IST

३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकºयांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

- अझहर अली लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : महाआघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीपासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे. अटी, निकष तसेच कर्जाचे पुनर्गठन केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा केली. यात शेतकºयांना २ लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली. थकित कर्जदारांची यादी बँकांना देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. परंतु आता ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शेतकºयांकडून करण्यात येत आहे. शासनस्तरावरून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ संदर्भातील अध्यादेश शासनाने काढला.दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर दोन लाखांपेक्षा एक रूपयाही अतिरिक्त कर्ज असल्यास तो शेतकरी या योजनेस पात्र ठरणार नाही. दोन लाखाच्या वर थकित कर्ज असलेल्या शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.परंतु त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने त्यांची कर्जमुक्ती होणार नाही. या योजनेअंतर्गत ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्ज खात्याचं व्याज आणि थकबाकी ही २ लाखांपर्यंत असावी, अशी अट घालण्यात आली आहे.तसेच अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकºयांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. एप्रिल २०१५ पुर्वीचे कर्ज असलेला शेतकरीही या योजनेस पात्र राहणार नाही.२०१३-१४ मधील बहुसंख्य थकीत कर्जदारांनी शासनाच्या आदेशानुसार २०१५-१६ मध्ये कर्जाचे पुनर्गठन केले, अशा शेतकºयांनाही या कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला. कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांसाठी तत्कालीन सरकारने मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या थकीत कर्जदार शेतकºयांना दिलासा देत थकित कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले.जुलै ते ३० सप्टेंबर या दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी कर्जाचे पुनर्गठन केले. यात सर्व शेतकºयांनी २०१८ पूर्वी बँकांकडून कर्ज घेतले होते. गत वर्षी कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व २०१८ पूर्वी थकीत असलेल्या कर्जदारांचे पुनर्गठन करण्याचे आदेश फडणवीस सरकारने दिले होते. ३१ मार्च ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत बँकांनी शेतकºयांनी कर्ज व पुनर्गठण अर्ज स्वीकारून त्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची अडचण होणार आहे.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरFarmerशेतकरी