शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शेतकऱ्यांपर्यंत हवामनाचा अंदाज पोहचविण्यासाठी कटिबद्ध - मनेश यदुलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 22:40 IST

जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो हवामनाचा अंदाज!

बुलडाणा: हवामान बदलाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा संवेदनशील जिल्हा असल्याने शेती व्यवस्थापनात मदत होण्यासोबतच हवामान बदलापासून सुरक्षा व सतर्क करण्यासाठी जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना नियमित स्वरुपात हवामानाचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पाच दिवसांच्या हवामानाचा हा अंदाज असून मंगळवार आणि शुक्रवारी मराठी भाषेतून तो दिला जात असल्याची माहिती जिल्हा कृषी हवामान केंद्राचे विषय विशेषज्ञ मनेश यदुलवार यांनी दिली. गेल्या दोन वर्षापासून हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दोन दिवसापूर्वी हवमानात अचानक झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

 

बुलडाणा येथे जिल्हा कृषी हवमान केंद्र कधी सुरू झाले? बुलडाणा येथे मार्च २०१९ पासून जिल्हा कृषी हवामान केंद्र सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला मराठी भाषेत कोणत्याही माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. १८ हजार शेतकऱ्यांपर्यंत सध्या आम्ही पोहोचत असून टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांची संख्या यात वाढविणार आहोत. आत्मा कार्यालयाकडूनही यासाठी सहकार्य मिळत आहे.

सध्या कोठे कोठे हवमान केंद्र उभारले गेले आहेत?

हवामान संवेदनशील जिल्ह्यात प्रामुख्याने स्वयंचलीत हवामान केंद्र उभारले गेले आहेत. विदर्याभामध्ये गडचिरोली, भंडारा, नागपूर, अमरावती, वाशीम या ठिकाणी अकोला कृषी विद्यापीठातंर्गत हवामान केंद्र उभारण्यात आले आहेत. बुलडाणा येथील हवामान केंद्र हे हैद्राबाद येथील कोरडवाहू शेती संशोधन संस्थेने दिले आहे. त्याचाही सध्या हवामान बदल व कृषी विषयक सल्ला देण्यासाठी उपयोग होत आहे.

आणखी एक हवमान केंद्र उभारण्यासंदर्भात हालचाली आहेत का?

हो.बुलडाण येथे येत्या काळात सुमारे १२ लाख रुपये खर्च करून भारतीय हवामान विभागाच्या अखत्यारित अद्ययावत स्वयंचलीत हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. कोरोना संसर्गामुळे त्यास विलंब झाला आहे. मात्र ते उभारल्यानंतर अधिक अचूक माहिती उपलब्ध होईल.

नव्या उभारण्यात येणाऱ्या हवामान केंद्राचा फायदा काय?

हे केंद्र उभारल्यानंतर मातीचे तापमान, सुर्याची किरणे, दवबिंदूचा आकार, बाष्पीभवन, मातीतील अेालावा हा दैनंदिनस्तरावर मोजण्यास मदत मिळले. आदर्श निरीक्षण त्याद्वारे एक प्रकारे होईल. ५५ बाय ३६ मिटरच्या जागेत ते उभारण्यात येणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या दोन अधिकाऱ्यांनी गेल्या जुलै महिन्यात त्यानुषंगाने येथे भेट देवून पाहणी केली आहे.

दैनंदिन अंदाज कसा वर्तवला जातो?

स्वयंचलीत हवामान केंद्राकडून नोंदवलेली निरीक्षणे आणि मागील ३० ते ४९ वर्षातील उपलब्ध आकड्यांचा साकल्याने विचार करून हवमाना कसे राहील, मेघाच्छादन राहील का? याबाबत अंदाज वर्तविल्या जात आहे. येत्या काळात यातमध्ये अद्ययावत यंत्रणा आल्यानंतर अधिक अचूकता येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाweatherहवामानFarmerशेतकरी