शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मलकापूरः  वीजपुरवठा बंद असल्याने शेतकरी संतप्त; महावितरण कार्यलयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:38 IST

पिकांचे नुकसान होत असल्याने आज मंगळवारी सकाळी १०.३० वीजकंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात राडा घातल्याची घातला

मलकापूरः आठदिवसापासून वीजपुरवठा बंद असल्याने मलकापूर तालुक्यातील पाच गावातील संतप्त शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान होत असल्याने आज मंगळवारी सकाळी १०.३० वीजकंपनीच्या एमआयडीसी कार्यालयात राडा घातल्याची घातला.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे यांच्या मध्यस्थीने शेतकरी शांत झाले.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,तालुक्यातील वाघोळा,चिंचोल,कोरवाड,दुधलगांव,ददसरखेड अशा पाच गावात विजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना गहू, हरबरा या पिकांची वाढ करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवात संतप्त भावना आहेत.आज सकाळी संतप्त शेतकरी सरपंच संघटना अध्यक्ष रामराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजकंपनीच्या मलकापूर एमआयडीसी कार्यालयात दाखल झाले.त्यांनी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोटपोट,शिवीगाळ करीत तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली.या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपूरे घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, विजकंपनीचे कार्यकारी अभियंता साळी,उपविभागीय अभियंता अनिल शेगावकर,अभियंता चौधरी हे देखील दाखल झाले.संतप्त शेतकरी व वीजकंपनीचे  अधिकारी व कर्मचारी यांच्यात संतोषराव रायपूरे यांनी मध्यस्थी केली.पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी संवाद साधून त्यांनी ३५ पोलचा विषय डिपीडीसी च्या माध्यमातून सोडविण्यासंबंधी आश्चस्त  करून वाद संपुष्टात आणला. त्यानंतर  विनोद कारंजकर ,गणेश सपकाळ, रमेश जैस्वाल, निलेश अहीर,मंगेश टाकरखेडे,नितीन पाचपोर,विलास कांडेलकर,योगेश चोपडे, मोहन गावंडे,आदीसह संतप्त शेतकरी शांत झाले. दरम्यान एमआयडीसी पोलिसही घटनास्थळी दाखल झाली होती.

टॅग्स :MalkapurमलकापूरmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी