शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

मलकापूर : हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:02 IST

मलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन  महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात  आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देमलकापूर पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता

हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन  महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात  आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की सन १९७८ साली धोपेश्‍वर येथून  कार्यान्वित वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. तांत्रिक  अडचणीमुळे पूर्णामायच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर  आधारित या योजनेत अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठीच्या झळा स्थानीय  नागरिकांनी सोसल्या. गेली २0 वर्षे पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा पाणी  पुरवठा देवा देवा करीत नियंत्रणात आला आहे. फेब्रुवारी १६ पासून चौ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारण ११.५0 कोटींच्या  पाइपलाइनचा वापर सुरू झाला आहे.विद्यमान परिस्थितीत आलबेल चालू असताना फेब्रुवारीच्या मध्यावधी तच हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची धक्कादायक  माहिती आहे. म्हणजे ३८८ द.ल.घ.मी. क्षमतेच्या धरणात मृतसाठा  वगळता केवळ २१0 द.ल.घ.मी एवढा जलसाठा आहे. विशेष म्हणजे  या धरणावरच खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील ३२ मुख्य  योजनांसह लहान-मोठय़ा योजना कार्यान्वित आहेत. त्यात रेल्वे, वीज  प्रकल्प, साखर कारखाने, नगरपालिका, एमआयडीसी, ग्रामपंचायती  यांचा सामवेश आहे.  याच धरणावरून हजारोंच्या संख्येने अवैधरीत्या  पाणी उपसादेखील करण्यात येतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच ६0  टक्क्यांवर आलेला जलसाठा किती काळ पुरणार, असा सवाल आता  उपस्थित होऊ लागला आहे. पर्यायाने पाण्याचे बाष्पीभवन आणि उपसा  अशा दोन प्रक्रियेत ‘त्या’ जलसाठय़ात घट येण्याची शक्यता आहे.  परिणामी, बॅकवॉटरची पातळी लक्षवेधी स्वरूपात कमी होऊन मलका पूरच्या एक लाख लोकांसाठीची पाणी पुरवठा योजना येत्या दोन  महिन्यांत संकटात येण्याचे संकेत आहेत. त्यावर उपाययोजनेची गरज  त्यानिमित्ताने प्रतिपादित होताना दिसत आहे.

ग्रामीण भागालाही झळ!मलकापूर तालुक्यात २२ गाव नळ योजना, वडोदा ५ गाव नळ योजना,  एमआयडीसी आदीसह विविध योजना हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर  आधारित आहेत. पर्यायाने सव्वालाख नागरिक त्या माध्यमातून  अडचणीत येण्याची भीती असून, ग्रामीण भागालाही त्यांच्या झळा  बसण्याचे संकेत आहेत.

अवैध उपशावर कारवाई व्हावी!हनतूर धरणाच्या जलसाठय़ातून मलकापूर पा.पु. योजनेपर्यंतच्या ११ कि  .मी. अंतरात शेकडो ठिकाणी पाण्याचा अवैधरीत्या उपसा केला जात  आहे. त्यावर अवैध पाणी उपसा समितीने चौकशी करून कारवाई  करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

विद्यमान परिस्थितीत हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्के आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाही आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्या उ पाययोजनांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्या-ज्या ठिकाणी सध्या  समस्या येत आहेत, त्या सोडविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.  अडचण येऊ नये, आम्ही कार्यरत आहोत.- एस.आर.पाटील, सहायक अभियंता हतनूर प्रकल्प.

पाण्याअभावी मलकापूरकरांनी काय सोसलंय याची जाण आणि भान  आम्हाला आहे. त्यासाठीच आम्ही नवीन पाइपलाइनवर भर देऊन पाणी  पुरवठा आटोक्यात आणला. सद्यपरिस्थिती चांगली दिसते; मात्र येणार्‍या  काळात अडचण येऊ नये म्हणून हतनूर धरणाच्या पाण्यावर  आरक्षणाच्या रकमा भरल्या आहेत. जनतेने पाण्याचा योग्य वापर  करावा, अशी आमची विनंती आहे.- अँड. हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर.

टॅग्स :MalkapurमलकापूरbuldhanaबुलडाणाWaterपाणी