शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर : हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:02 IST

मलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन  महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात  आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देमलकापूर पाणी पुरवठा योजना संकटात येण्याची शक्यता

हनुमान जगताप । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील अनेक योजना  निर्भर असलेल्या हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची  धक्कादायक माहिती आहे. याच धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरची  पाणी पुरवठा योजना आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फेब्रुवारीच्या  उत्तरार्धातच जलसाठय़ाची बिकट अवस्था म्हटल्यावर येत्या दोन  महिन्यांत शहरातील सुमारे एक लाख लोकांवर जलसंकट येण्याची श क्यता आहे. त्यामुळे देवा देवा करून तब्बल २0 वर्षांनंतर नियंत्रणात  आलेल्या पाणी पुरवठय़ावर आता गंडांतर येण्याचे संकेत आहेत.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की सन १९७८ साली धोपेश्‍वर येथून  कार्यान्वित वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. तांत्रिक  अडचणीमुळे पूर्णामायच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर  आधारित या योजनेत अनेक वर्षे पिण्याच्या पाण्यासाठीच्या झळा स्थानीय  नागरिकांनी सोसल्या. गेली २0 वर्षे पंधरा-पंधरा दिवसांनी होणारा पाणी  पुरवठा देवा देवा करीत नियंत्रणात आला आहे. फेब्रुवारी १६ पासून चौ थ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कारण ११.५0 कोटींच्या  पाइपलाइनचा वापर सुरू झाला आहे.विद्यमान परिस्थितीत आलबेल चालू असताना फेब्रुवारीच्या मध्यावधी तच हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्क्यांवर आल्याची धक्कादायक  माहिती आहे. म्हणजे ३८८ द.ल.घ.मी. क्षमतेच्या धरणात मृतसाठा  वगळता केवळ २१0 द.ल.घ.मी एवढा जलसाठा आहे. विशेष म्हणजे  या धरणावरच खान्देश-विदर्भाच्या सीमावर्ती भागातील ३२ मुख्य  योजनांसह लहान-मोठय़ा योजना कार्यान्वित आहेत. त्यात रेल्वे, वीज  प्रकल्प, साखर कारखाने, नगरपालिका, एमआयडीसी, ग्रामपंचायती  यांचा सामवेश आहे.  याच धरणावरून हजारोंच्या संख्येने अवैधरीत्या  पाणी उपसादेखील करण्यात येतो. त्यामुळे फेब्रुवारीच्या उत्तरार्धातच ६0  टक्क्यांवर आलेला जलसाठा किती काळ पुरणार, असा सवाल आता  उपस्थित होऊ लागला आहे. पर्यायाने पाण्याचे बाष्पीभवन आणि उपसा  अशा दोन प्रक्रियेत ‘त्या’ जलसाठय़ात घट येण्याची शक्यता आहे.  परिणामी, बॅकवॉटरची पातळी लक्षवेधी स्वरूपात कमी होऊन मलका पूरच्या एक लाख लोकांसाठीची पाणी पुरवठा योजना येत्या दोन  महिन्यांत संकटात येण्याचे संकेत आहेत. त्यावर उपाययोजनेची गरज  त्यानिमित्ताने प्रतिपादित होताना दिसत आहे.

ग्रामीण भागालाही झळ!मलकापूर तालुक्यात २२ गाव नळ योजना, वडोदा ५ गाव नळ योजना,  एमआयडीसी आदीसह विविध योजना हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर  आधारित आहेत. पर्यायाने सव्वालाख नागरिक त्या माध्यमातून  अडचणीत येण्याची भीती असून, ग्रामीण भागालाही त्यांच्या झळा  बसण्याचे संकेत आहेत.

अवैध उपशावर कारवाई व्हावी!हनतूर धरणाच्या जलसाठय़ातून मलकापूर पा.पु. योजनेपर्यंतच्या ११ कि  .मी. अंतरात शेकडो ठिकाणी पाण्याचा अवैधरीत्या उपसा केला जात  आहे. त्यावर अवैध पाणी उपसा समितीने चौकशी करून कारवाई  करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.

विद्यमान परिस्थितीत हतनूर धरणाचा जलसाठा ६0 टक्के आहे.  दरवर्षीप्रमाणे यंदाही आगामी पाणीटंचाई लक्षात घेऊन त्या उ पाययोजनांसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्या-ज्या ठिकाणी सध्या  समस्या येत आहेत, त्या सोडविण्यासाठी आम्ही काम करीत आहोत.  अडचण येऊ नये, आम्ही कार्यरत आहोत.- एस.आर.पाटील, सहायक अभियंता हतनूर प्रकल्प.

पाण्याअभावी मलकापूरकरांनी काय सोसलंय याची जाण आणि भान  आम्हाला आहे. त्यासाठीच आम्ही नवीन पाइपलाइनवर भर देऊन पाणी  पुरवठा आटोक्यात आणला. सद्यपरिस्थिती चांगली दिसते; मात्र येणार्‍या  काळात अडचण येऊ नये म्हणून हतनूर धरणाच्या पाण्यावर  आरक्षणाच्या रकमा भरल्या आहेत. जनतेने पाण्याचा योग्य वापर  करावा, अशी आमची विनंती आहे.- अँड. हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर.

टॅग्स :MalkapurमलकापूरbuldhanaबुलडाणाWaterपाणी