शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

गावातील शाळाच करा क्वारंटाईन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:31 IST

सिंदखेडराजा: ग्रामीण भागातही काेराेना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. केवळ निर्बंध असल्याने गावाकडची मंडळी लग्न, दवाखाना इतर कामांसाठी बाहेर पडत ...

सिंदखेडराजा: ग्रामीण भागातही काेराेना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. केवळ निर्बंध असल्याने गावाकडची मंडळी लग्न, दवाखाना इतर कामांसाठी बाहेर पडत आहेत़ त्यामुळे रुग्णसंख्या वाढते आहे़ अशा परिस्थितीत गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारून सौम्य लक्षणे असलेल्यांना त्याच सेंटरमध्ये ठेवून उपचार करण्याची गरज आहे.

कोरोनाकाळात मागील वर्षी ज्या उपाययोजना केल्या गेल्या, त्यात गावातील शाळा क्वारंटाईन सेंटरमध्ये बदलण्यात आल्या होत्या़ त्यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना गावाबाहेर ठेवले जात होते़ तोच प्रयोग आता पुन्हा करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या नगण्य असली तरीही गावातील कोरोनाचे लक्षण असलेल्या नागरिकांना किंवा ज्यांना गृहविलगीकरणात ठेवण्याच्या सूचना आहेत अशा आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना या सेंटरमध्ये ठेवल्यास गावातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्यास मदत होऊ शकणार आहे. प्रशासनाने याबाबत विचार करून कार्यवाही करण्याची गरज असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

मागील वर्षी याच महिन्यात कोरोनाची प्रचंड दहशत निर्माण झाली होती.भीतीने प्रत्येकजण घराबाहेर पडायचे तर सोडा दाराबाहेर डोकावून पाहत नव्हता़ परंतु, यावर्षी परिस्थिती बदलली. लोकांमधील भीती दूर झाली असली तरीही कोरोना यावर्षी नव्या रूपात आहे,अधिक भीषण आहे. भिण्याचे कारण नसले तरीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी गावातील शाळा क्वारंटाइन सेंटरमध्ये रूपांतरित केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आपण रोखू शकतो.

ॲड. राजेंद्र ठोसरे,सिंदखेडराजा