शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

By निलेश जोशी | Updated: October 5, 2023 18:07 IST

भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

बुलढाणा : जागतिक स्तरावर तिरंदाजीमध्ये एक महाशक्ती म्हणून भारताचा संघ सध्या लौकिक पावत असून ५ ऑक्टोबर रोजी भारतीय तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी ही देशाच्या दृष्टीने जशी ऐतिहासिक आहे तशीच ती महाराष्ट्राच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरली आहे. कारण भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

त्यातच ४ ऑक्टोबरला नागपूरच्या अेाजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कम्पाऊंट मिश्र प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरेल आहे. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय तिरंदाजी संघात संचारलेला उत्साह पाहता ५ ऑक्टोबर रोजी भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजांनी कमाल करत सुवर्ण पटकावले. त्यामुळे तिरंदाजीच्या दृष्टीने ५ ऑक्टोबरचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा विचार करता या संघात महाराष्ट्रातील महिला व पुरुष मिळून तीन खेळाडू सहभागी आहेत. 

सुवर्ण पदकाच्या कमाईत त्यांचे योगदान हे ऐतिहासिक असून महाराष्ट्राच्या तिरंदाजीच्या इतिहासातील हे एक सुवर्ण पान म्हणावे लागले. यामध्ये साताऱ्याची सामान्य घरातून आलेली आदिती स्वामी, नागपूरचा अेाजस देवतळे आणि बुलढाण्याचा अगदीच सामान्य कुटुंबातून आलेला प्रथमेश जावकार यांचा समावेश आहे.कम्पाऊंड प्रकारात भारताचा संघ हा जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यासह अंतिम सामन्यातही पुरुष संघाने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रात बुलढाणा, साताऱ्यासह नागपूरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अेाजस देवतळेनेतर कमाल केली आहे. आतापर्यंत त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत दोन सुवर्णांची कमाई केली आहे. दरम्यान मिळालेले हे यश सांघिक कामगिरीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे भारताचे पुर्वाश्रमीचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांनी स्पष्ट केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. हे या मुलांनी सिद्ध केल्याचे ते म्हणाले.

 तिरंदाजीत भारताची आणखी दोन पदके निश्चित आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताची आणखी दोन पदके निश्चित झालेली आहे. ७ ऑक्टोबरला वैयक्तिक बाद फेरीचा अंतिम सामना आहे. गंमत म्हणजे यामध्ये भारताचा दिल्लीचा अभिषेक वर्मा आणि नागपूरच्या तेजस देवतळेमध्ये सुवर्ण पदकासाठी सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल दोघापैकी कोणाच्याही एकाच्या पक्षात गेला तरी भारतासाठी सुवर्ण आणि रजत पदक निश्चितच झालेले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Maharashtraमहाराष्ट्र