शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत महाराष्ट्रातील मुलांची कमाल; ऐतिहासिक कामगिरीने वेधले लक्ष 

By निलेश जोशी | Updated: October 5, 2023 18:07 IST

भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

बुलढाणा : जागतिक स्तरावर तिरंदाजीमध्ये एक महाशक्ती म्हणून भारताचा संघ सध्या लौकिक पावत असून ५ ऑक्टोबर रोजी भारतीय तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली कामगिरी ही देशाच्या दृष्टीने जशी ऐतिहासिक आहे तशीच ती महाराष्ट्राच्या दृष्टीनेही ऐतिहासिक ठरली आहे. कारण भारतीय संघामधील महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंनी पात्रता फेरीच्या सामन्यांपासून आपला खेळ उंचावत नेत प्रतिस्पर्धी संघांना डोके वर काढू दिलेले नाही.

त्यातच ४ ऑक्टोबरला नागपूरच्या अेाजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कम्पाऊंट मिश्र प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरेल आहे. या खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारतीय तिरंदाजी संघात संचारलेला उत्साह पाहता ५ ऑक्टोबर रोजी भारताच्या पुरुष व महिला तिरंदाजांनी कमाल करत सुवर्ण पटकावले. त्यामुळे तिरंदाजीच्या दृष्टीने ५ ऑक्टोबरचा दिवस एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचा विचार करता या संघात महाराष्ट्रातील महिला व पुरुष मिळून तीन खेळाडू सहभागी आहेत. 

सुवर्ण पदकाच्या कमाईत त्यांचे योगदान हे ऐतिहासिक असून महाराष्ट्राच्या तिरंदाजीच्या इतिहासातील हे एक सुवर्ण पान म्हणावे लागले. यामध्ये साताऱ्याची सामान्य घरातून आलेली आदिती स्वामी, नागपूरचा अेाजस देवतळे आणि बुलढाण्याचा अगदीच सामान्य कुटुंबातून आलेला प्रथमेश जावकार यांचा समावेश आहे.कम्पाऊंड प्रकारात भारताचा संघ हा जागतिक क्रमावारीत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे उपांत्य सामन्यासह अंतिम सामन्यातही पुरुष संघाने अपेक्षेप्रमाणे एकतर्फी विजय मिळविला. त्यामुळे महाराष्ट्रात बुलढाणा, साताऱ्यासह नागपूरमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. अेाजस देवतळेनेतर कमाल केली आहे. आतापर्यंत त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत दोन सुवर्णांची कमाई केली आहे. दरम्यान मिळालेले हे यश सांघिक कामगिरीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे भारताचे पुर्वाश्रमीचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांनी स्पष्ट केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. हे या मुलांनी सिद्ध केल्याचे ते म्हणाले.

 तिरंदाजीत भारताची आणखी दोन पदके निश्चित आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताची आणखी दोन पदके निश्चित झालेली आहे. ७ ऑक्टोबरला वैयक्तिक बाद फेरीचा अंतिम सामना आहे. गंमत म्हणजे यामध्ये भारताचा दिल्लीचा अभिषेक वर्मा आणि नागपूरच्या तेजस देवतळेमध्ये सुवर्ण पदकासाठी सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल दोघापैकी कोणाच्याही एकाच्या पक्षात गेला तरी भारतासाठी सुवर्ण आणि रजत पदक निश्चितच झालेले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAsian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Maharashtraमहाराष्ट्र