बुलडाणा : करडी येथील एका विवाहीत महिलेला घरी साप चावला, गंभीर अवस्थेत तीला बुलडाणा येथे उपचारासाठी नेत असतांना मार्गातच तिचा मृत्यू झाला. सदर महिलेला धाड येथील रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाला नाही,त्यामुळे तिचा मृत्यू झाला. असा आरोप करुन मृत महिलेच्या नातेवाईकासह नागरिकांनी आज धाड रुग्णालयाला कुलूप ठोकले. जळगाव (खा) जिल्ह्यातील तोंडापुर येथील मो.फिरोज मागील काही दिवसापासून धाड नजिकच्या करडे येथे मुक्कामी होते. आज दुपारी २ वाजता त्यांची पत्नी रुख्साना बी यांना विषारी सापाने दंश केला. यामुळे तीला गंभीर अवस्थेत धाड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तीला तेथे उपचार मिळाला नाही. तेथे वैयकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे तेथील एका आरोग्य सेवकाने रुख्साना बी यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र बुलडाणा येथे नेत असतांना मार्गात तिचा मृत्यू झाला. ही बाब गावात माहिती पडताच, संतप्त नागरिका आणि नातेवाईकांनी धाड येथील ग्रामीण रुग्णाल गोंधळ घातला. यानंतर नागरिकांकडून रुग्णालयाच्या प्रवेशदाराला कुलूप ठोकण्यात आले. धाड येथील रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीमुळे रुख्साना बीचा मृत्यू झाला, असा आरोप मृत महिलेचे वडील शे.पाशु यांनी केला आहे.
नागरिकांनी ठोकले रुग्णालयाला कुलूप
By admin | Updated: June 12, 2014 22:17 IST