शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

दु:ख उजागर करण्याचे साहित्य हे प्रभावी माध्यम! - साहित्यिक नवनाथ गोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:45 IST

अनिल गवई खामगाव : साहित्यिक समाजात जसा जगतो,  जसा वावरतो. त्याचेच चित्रण त्याच्या साहित्यात उतरते आणि म्हणूनच वेदना आणि ...

अनिल गवई

खामगाव : साहित्यिक समाजात जसा जगतो,  जसा वावरतो. त्याचेच चित्रण त्याच्या साहित्यात उतरते आणि म्हणूनच वेदना आणि दु:ख साहित्यातून उजागर होते. दु:ख उजागर करण्यासाठी साहित्यासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही, असे आपले प्रामाणिक मत असल्याची कबुली ज्येष्ठ साहित्यिक तथा ‘फेसाटी’कार नवनाथ गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.  आधुनिक युगात ‘एडीट आणि डीलीट’चा प्रभाव जाणवत असला तरी साहित्याला कोणत्याही युगात ‘तोड’ नाही. ‘जुनं ते सोनं’ या उक्तीप्रमाणे साहित्य हे अजरामर असल्याचे ते म्हणाले.तिसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनासाठी ते खामगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

 प्रश्न : साहित्यक्षेत्राच्या वाटचालीबद्दल काय सांगाल ?

- पदव्युत्तर शिक्षण घेत असताना, काही साहित्यिकांशी गाठ पडली. त्यांच्या सोबतीमुळे साहित्याची गोडी लागली. जगण्याने बरेच काही शिकता आले.  अनुभवाचा साठाही साहित्यक्षेत्रात कामी आला असला तरी आपल्या साहित्य क्षेत्रातील वाटचालीत विष्णू पावले, विनोद कापसे, आणि आप्पा बुडके हे मैलाचे दगड ठरले. मित्रांच्या सहकार्यांमुळेच आपली साहित्य क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली.  

प्रश्न : साहित्य क्षेत्रातील पहिली कलाकृती कधी उदयास आली ?

- पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच, मित्रांशी साहित्यासंबधीत गप्पा रंगायच्या. मिळेल ते वाचायचो. त्यामुळे वाचनाची आणि लेखनाची गोडी लागली. यातूनच ‘काळ’नावाची पहिली कथा उदयास आली. ती प्रकाशीत झाल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडला. कालातंराने ‘सुबंरान’या आख्यानरुपात मांडायच्या कांदबरीचे रूप सापडले. अशा पध्दतीने आपल्यातील साहित्यकाचा प्रवास सुरू झाला.  

प्रश्न : साहित्य क्षेत्रात कुणा-कुणाचे पाठबळ मिळाले?

- अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून आपली साहित्यिक वाटचाल राहीली आहे. शिक्षणासाठीच संघर्ष करावा लागल्याने, ‘फेसाटी’ची निर्मिती होण्यापूर्वी आपण फार साहित्य वाचले असे म्हणता येणार नाही.  आयुष्यात जे जगत आलो आणि जगत आहे. त्याचीच मांडणी साहित्यात केली. साहित्य क्षेत्रात शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रणधीर शिंदे आपले प्रेरणास्त्रोत आहेत. समिक्षक डॉ. राहुल अशोक पाटील, आनंद विंगकर, डॉ. आशुतोष पाटील, उमेश मोहिते, डॉ. राजन गवस, डॉ. नंदकुमार मोरे आणि डॉ. दत्ता घोलप यांचे योगदान विसरता येणार नाही.

  प्रश्न : साहित्य क्षेत्रात आपणाला आनंद देणारी बाब कोणती ?  - आपल्या सारख्या सामान्य साहित्यिकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त होणं ही बाब आनंददायी तितकीच धक्कादायक होती. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सलग सात दिवस मोबाईल खणखणत होता.साहित्य अकादमी पुरस्कारामुळेच प्रकाशझोतात आलो. तसेच  बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘फेसाटी’ ही कादंबरी समाविष्ट झाल्याचेही समाधान असून, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांनी शुभेच्छांसोबतच पोटापाण्याचाही प्रश्न मिटविला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सद्यस्थितीत लोणी येथील पद्मभूषण विखे पाटील महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर समन्वयक म्हणून कार्यरत आहे. त्यांनीच विखे पाटलांशी बोलून आपल्या उपजिविकेचा प्रश्न मिटविला.  

प्रश्न : युवा पिढीसाठी आपला संदेश काय ? 

- आयुष्यात चढ-उतार कुणालाही चुकले नाहीत. तुम्ही प्रारंब्ध बदलवू शकत नाही. त्यामुळे आहे त्यात सुख मानत, जीवन क्रमत रहा. कोणतंही काम लहान आणि मोठं ठरत नाही. हा अनुभव आपल्या आयुष्यात घेतला आहे. आहे त्या कामाशी प्रामाणिक रहा. चालढकल वृत्तीने कुणाचेही भलं झालं नाही. त्यामुळे ‘कल करे सो आज, आज करे सो अभी’ एवढाच संदेश आपला ‘लोकमत’च्या माध्यमातून युवा पिढीला राहील.

टॅग्स :khamgaonखामगावliteratureसाहित्य