शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

बुलडाणा विभागातील २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 15:47 IST

४० बसगाड्या स्क्रॅब करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देविभागातंर्गत ५०० च्या जवळपास बसगाड्या.महिन्याकाठी बुलडाणा जिल्ह्यात ३० लाख लोक एसटीवर भरवसा ठेवून.बसगाड्यांपैकी २०० बसगाड्या प्रत्येकी १० लाख किलोमीटर धावलेल्या आहेत

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील तब्बल २६ लाख नागरिकांची दळणवळणाची महत्त्वाची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागातील तब्बल २०० पेक्षा अधिक बसगाड्यांची आयुष्यमर्यादा संपुष्टात आली असून ४० बसगाड्या स्क्रॅब करण्याची गरज निर्माण झाली आहे.राज्य परिवहन महामंडळास १६०० बसगाड्या देण्यासंदर्भात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. त्यामुळे एकट्या बुलडाणा विभागास १०० बसगाड्यांची गुणात्मक व दर्जेदार प्रवाशी सेवा देण्यासाठी गरज आहे. मात्र प्रत्यक्षात विभाग निहाय बसगाड्या वाटण्याचे सुत्र पाहता केवळ ५५ च्या आसपास बसगाड्या मिळण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी ४५ बसगाड्यांची मागणी बुलडाणा विभागाकडून करण्यात आली होती.मात्र त्यासाठी राज्यस्तरावर वेगाने हालचाली होऊन मुंबई येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून जिल्हानिहाय त्वरेने या बसगाड्यांचा पुरवठा होण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या केवळ बसगाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या राज्यातील ३० विभागांना मिळण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.एकट्या बुलडाणा जिल्ह्याचा विचार करता विभागातंर्गत ५०० च्या जवळपास बसगाड्या असून ४९० च्या आसपास दररोज शेड्यूल आहेत. दररोज एक लाख प्रवाशी या प्रमाणे महिन्याकाठी बुलडाणा जिल्ह्यात ३० लाख लोक एसटीवर भरवसा ठेवून सुरक्षीत प्रवासाची हमी असल्यामुळे लालपरीद्वारेच प्रवास करतात. त्यामुळे बुलडाणा विभाग नियंत्रक कार्यालयातंर्गतच्या बसगाड्यांचे सरासरी प्रवासी भारमान हे ७२ टक्क्यांवर असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ए. यू. कच्छवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. जिल्ह्यातील एकूण उपलब्ध बसगाड्यांपैकी २०० बसगाड्या प्रत्येकी १० लाख किलोमीटर धावलेल्या आहेत किंवा त्यांची १२ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक बसगाड्या या जुनाट झाल्या आहेत. त्यांच्या जागी नव्या बसगाड्यांची गरज आहे.

दोन वर्षात २५० अपघातएसटी बसगाड्याचे गेल्या दोन वर्षात २५० गंभीर व किरकोळ अपघात झालेले आहेत. जुनाट बसगाड्यांमुळे बस शेड्यूलवर असताना ती ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे बुलडाणा आगारा त्वरेने नवीन बसगाड्या मिळण्याची अवश्यकता असून त्यादृष्टीने विभाग नियंत्रक संदीप रायलवार व यंत्रणा सध्या पाठपुरावा करत आहेत. बुलडाणा विभागातंर्गत ६० वाहन चालकांचेही लवकरच प्रशिक्षण पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांनाही बसगाड्या उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी