शेगाव: गेल्या तीन आठवड्यांपासून पालभाज्यांचे दर स्थिर असले, तरी उन्हाच्या तडाख्यामुळे लिंबू व कोथिंबीर महागली आहे. कोथिंबीर जुडीचा दर १५ ते २0 रुपयांवर गेला आहे. लिंबू सरासरी पाच रुपयाला तीन नग व आकाराने लहान असलेला लिंबू पाच रुपयांमध्ये पाच आहे. मेथीचा दरही तेजीतच आहे. कांदा व बटाट्याचे दर स्थिर आहेत. कांदा ८ ते १५ रुपये किलो असून, बटाट्याचा दर २0 ते २५ रुपये किलो आहे. लसणाचा दर ६0 रुपये किलो झाला आहे. इतर फळभाज्यांचा दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे आहे. बेंद्री गवारी २0 ते २५ रुपये, देशी गवार १0 ते १५, गाजर ५0 ते ६0, वांगी २0 रुपये, भेंडी २0 ते ३0 रुपये, दोडका २0 ते २५ रुपये, काकडी १५ ते २0 रुपये, ढबू मिरची ४0 रुपये, हिरवी मिरची ४0 रुपये, कोबी १0 ते १५ रुपये, फ्लॉवर ३0 ते ४0 रुपये, कारली ४0 रुपये, भोपळा २0 ते २५ रुपये, बिज घेवडा ४0 रुपये, दुधी भोपळा पाच ते दहा रुपये प्रति नग, चिंच ६0 ते ८0, आले १00 ते १२0, लिंबू सहा ते दहा रुपये डझन, याप्रमाणे दर आहेत. पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. यामध्ये पालक प्रति जुडी ५ ते ८ रुपये, शेपू ७ ते ८ रुपये, तांदळ ७ ते १0 रुपये, लालमाठ ८ ते १0 रुपये, मेथी १५ ते १८ कोथिंबीर १८ ते २0 याप्रमाणे आहे. आंब्याचे दर आता सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. आजच्या आठवडी बाजारात हापूस आंब्याचा दर प्रति डझनाला दीडशे ते दोनशे अडीचशेच्या दरम्यान होता. पायरीचा दर प्रति डझनाला १२0 ते १३0 रुपये होता. तर लालबाग, बदाम, केसर आंबे ४0 ते ८0 रुपये याप्रमाणे विकल्या गेला.
लिंबू, कोथिंबीर महागली; आंबा आवाक्यात
By admin | Updated: May 22, 2014 23:41 IST