शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पावसाळा संपताच समुद्रातील शिवस्मारकाच्या कामाचा शुभारंभ - विनायक मेटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 14:05 IST

अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अ‍ॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी येथे दिली. 

-अनिल उंबरकार

शेगाव - अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अ‍ॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे यांनी येथे दिली.  विश्राम भवनमध्ये रविवारी ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शिवसंग्रामची बैठक पार पडली. बैठकीत शिवसंग्रामच्या गाव तेथे शाखा स्थापन करून संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना पुढे म्हणाले की, शिवस्मारकासोबत लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकतसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. पूर्वीच्या सरकारपेक्षा भाजपा - महायुतीचे सरकारने सर्वात जास्त कर्ज माफी शेतक-यांसाठी केली.

यामध्ये आॅनलाईन पद्धतीनं कर्जमाफीचे अर्ज भरून घेतल्याने भ्रष्टाचाराला फटका बसला. गत चार वर्षांत वेळोवेळी विविध शेतीपिकांना पिकविमा दिला. शेतकरी वर्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देणार हे पहीलं सरकार असून देवेंद्र फडणवीस सरकारच कौतुक नक्की केल पाहिजे असेही मेटे यावेळी म्हणाले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे राज्याला दिशा देणारं , व्हीजन असणारं कर्तृत्वान नेतृत्व  असल्याची प्रशंसासुद्धा त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील शिवशाहीच राज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी काम करावं , त्याचे विचार ही आचरणात आणावे असे आवाहनही आ. विनायक मेटे यांनी शेवटी केले. यावेळी अजय बिल्लारी, वंदना निकम, पंजाबराव देशमुख, रंगराव देशमुख,  सरपंच डॉ सुरज पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVinayak Meteविनायक मेटे