शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भूसंपादन प्रक्रियेने घेतला वेग!

By admin | Updated: December 14, 2015 02:19 IST

जिगाव प्रकल्पासाठी ८८९ हेक्टर जमिनीचा निवाडा घोषित.

खामगाव: १ लाख १ हजार ८८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणार्‍या जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला असून, पहिल्या टप्प्यातील ८८९.३४ हेक्टरच्या भूसंपादनाचा निवाडा प्रशासकीय पातळीवर घोषित करण्यात आला असून, सहा गावांतील सात प्रकरणांमध्ये अंतिम निवाडाही घोषित करण्यात आला आहे.परिणामी जवळपास २0 भूसंपादनाच्या प्रकरणात शेतकर्‍यांना लवकरच मोबदला मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर सध्या प्रक्रिया पूर्णत्वास जात आहे. गेल्या महिन्यात अमरावती येथे राज्यपालांच्या उपस्थितीत सिंचन अनुशेष निर्मूलनासंदर्भात झालेल्या बैठकीत जिगाव प्रकल्पाच्या भूसं पादनाच्या वेगासंदर्भात चर्चा होऊन १६६ कोटी रुपये या कामासाठी देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते. त्यानुषंगाने आता कार्यवाही होत आहे.सध्या होत असलेले भूसंपादन हे प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातील असून, धरणाजवळील जिगाव, टाकळी वत पाळ, पलसोडा, खरकुंडी, पळशी घाट या भागातील भूसंपादनाचा हा मोबदला शेतकर्‍यांना मिळत आहे.दरम्यान, जवळपास २0 प्रकरणांमध्ये निवाडा घोषित झाला असून, जिगाव, पळशी वैद्य, येरळी, खरकुंडी, टाकळी वतपाळ, पलसोडा, पिंपळगाव काळे, मानेगाव, पळशी घाट, करणवाडी, चांदूरबिस्वा, मिगाव, दहिगाव, नांदुरा, मामिनाबाद येथील ही २0 प्रकरणे आहेत. अल्पावधीतच संपादित जमिनीचा मोबदला येथील शे तकर्‍यांना मिळणार आहे. पुनर्वसनासाठी ७३३ हेक्टरची गरजपहिल्या टप्प्यात धरणालगतच्या गावातील व शेतजमिनीचे भूसंपादन होत आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे २७ हजार ६00 एवढी मोठी लोकसंख्या बाधित होत असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी ७३३ हेक्टर जमिनीची गरज आहे. प्रकल्पामुळे ४७ गावे बाधित होत असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी मध्यंतरी १२१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. अद्यापही उर्वरित जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पाच टप्प्यांत भूसंपादनजिगाव प्रकल्पासाठी एकूण पाच टप्प्यांत भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात प्रकल्पाजवळील सहा गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. दुसर्‍या टप्प्यात आठ गावे, तिसर्‍या टप्प्यात १३, तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात अंशत: बाधित होणारी १४ गावांचा समावेश आहे.