शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

कोद्री येथील ३० कुटूंबांचा  मतदानावरील बहिष्कारावर कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 14:51 IST

संग्रामपूर: तालुक्यातील कोद्री येथील ३० कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी मतदान केले नसल्याचे दिसून आले. 

संग्रामपूर: तालुक्यातील कोद्री येथील ३० कुटुंबांचा मतदानावर बहिष्कार कायम आहे. गुरूवारी दुपारी २ वाजेपर्यंत त्यांनी मतदान केले नसल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी यांना श्रीराम खोंड व घरकुलापासून वंचित लाभार्थ्यांनी निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. यावर प्रशासनाकडून तोंडगा काढण्यात न आल्याने येथील घरकुलाच्या लाभापासून वंचित असलेले ३० कुटुंबीय मतदानाच्या बहिष्कारावर ठाम आहेत. बहुचर्चित संग्रामपूर तालुक्यातील कोद्री येथे घरकुल वाटपात अफरातफर करून बनावट कागद पत्राच्या आघारे अपात्राला लाभ दिल्याप्रकरणी येथील तत्कालीन ग्रामसेवक डोंगरे यांच्या निलंबनानंतर आता दुसºया तत्कालिन ग्रामसेवकावर कर्तव्यात कसुरचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावून मोकळे झालेले प्रशासन कार्यवाही करण्यास तयार नसल्याने येथील वंचित लाभार्थी आक्रमक झाले. कोद्री येथील नागरिकांनी गेल्या एका वषार्पासून न्याय मिळवण्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवुन आंदोलने केली. परंतु प्रशासनाने जाणीवपूर्वक येथील घरकुल घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत झालेला प्रकार दाबण्याचे नियोजनबद्ध कार्यक्रम आखले असून घरकुल वाटप अफरातफर प्रकरणी काही दिवस आधी एका ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले. तर दुसºया तत्कालीन ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी ए. एल. बोंद्रे यांनी एका पत्रकाद्वारे तत्कालिन ग्रामसेवक एस.यु.बेलोकार यांना कोद्री येथील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल वाटपामध्ये अनियमितता केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस दिली. परंतु कारवाई करण्यात आली नाही तसेच  वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारचे पाऊले उचलण्यात न आल्याने येथील वंचित लाभार्थ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. तरीही प्रशासनाने येथील घरकुल प्रकरण गंभीरतेने न घेतल्याने गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर येथील ३० कुटुंबीयांनी बहिष्कार कायम ठेवल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)

आमचा घरकुलाचा प्रश्न सुटला नसल्याने आम्ही ३० कुटूंबांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे जाहिर केले होते. अद्याप समस्या तशाच असल्याने मतदान करणार नाही.श्रीराम खोंडमतदार, कोद्री ता.संग्रामपूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkhamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरbuldhana-pcबुलडाणा