शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:19 IST

आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर कृषी विभागाचे पेरण्याचे नियोजन असून आतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा तालुक्यात पावसाचा जोर सातत्यपूर्ण असल्याने या तालुक्यातील जवळपास २८ टक्के पेरण्या पावसामुळे रखडल्याचे चित्र आहे.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुषंगाने विचार करता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने कापसाचा पेरा हा एक लाख ४६ हजार ४१३ हेक्टरवर झाला असून सोयाबीनचा पेरा दोन लाख ४९ हजार ४०२ हेक्टरवर झाला आहे. एकुण सरासरी क्षेत्राच्या ३३.३० टक्के हा पेरा झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीच्या पेºयाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यात जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने ओढ दिली होती. दुष्काळी स्थितीत ही स्थिती अधिकच दाहकता निर्माण करणारी होती. मात्र त्यानंतर २३ जून पासून जिल्ह्यात पावसाने संततधार हजेरी लावली. परिणामी प्रारंभी शेतकºयांना पेरण्या करणेही अवघड झाले होते. त्यातच बुलडाणा तालुक्यातील धाड, देऊळघाट, सागवन, कोलवड, तांदुळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. त्यातच या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अद्यापही बुलडाणा तालुक्यातील २८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या मात्र रखडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यास या तालुक्यात राहिलेल्या पेरण्या पूर्ण होऊ शकतात. 

बुलडाण्याची पावसाचीसरासरी ४९ टक्के४बुलडाणा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४९ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात दररोज संततधार पावसाची हजेरी लागत असल्याने जवळपास २८ टक्के पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. बुलडाणा तालुक्यात सरासरी ७५ हजार ५०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ३८८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस पडला आहे.७५ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेराजिल्ह्यात दोन लाख ८७ हजार ६०५ हेक्टरवर कडधान्य पेºयाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यापैकी आतापर्यंत ९९ हजार ५०५ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. यात ४९ हजार ७०८ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून उडीदाचा पेरा हा ११ हजार ७२६ हेक्टरवर झालेला आहे. दरम्यान तेलबियांचा पेरा हा दोन लाख ५० हजार ४२३ हेक्टरवर करण्यात आलेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी