शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

बुलडाणा जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:19 IST

आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

ठळक मुद्देआतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर कृषी विभागाचे पेरण्याचे नियोजन असून आतापर्यंत ६६.३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. दरम्यान, बुलडाणा तालुक्यात पावसाचा जोर सातत्यपूर्ण असल्याने या तालुक्यातील जवळपास २८ टक्के पेरण्या पावसामुळे रखडल्याचे चित्र आहे.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात सात लाख ४८ हजार ८०० हेक्टरवर पेण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुषंगाने विचार करता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चार लाख ९६ हजार ४४१ हेक्टवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. यात प्रामुख्याने कापसाचा पेरा हा एक लाख ४६ हजार ४१३ हेक्टरवर झाला असून सोयाबीनचा पेरा दोन लाख ४९ हजार ४०२ हेक्टरवर झाला आहे. एकुण सरासरी क्षेत्राच्या ३३.३० टक्के हा पेरा झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन व कपाशीच्या पेºयाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.दुसरीकडे जिल्ह्यात जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने ओढ दिली होती. दुष्काळी स्थितीत ही स्थिती अधिकच दाहकता निर्माण करणारी होती. मात्र त्यानंतर २३ जून पासून जिल्ह्यात पावसाने संततधार हजेरी लावली. परिणामी प्रारंभी शेतकºयांना पेरण्या करणेही अवघड झाले होते. त्यातच बुलडाणा तालुक्यातील धाड, देऊळघाट, सागवन, कोलवड, तांदुळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. त्यातच या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अद्यापही बुलडाणा तालुक्यातील २८ टक्के क्षेत्रावरील पेरण्या मात्र रखडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाने उघडीप दिल्यास या तालुक्यात राहिलेल्या पेरण्या पूर्ण होऊ शकतात. 

बुलडाण्याची पावसाचीसरासरी ४९ टक्के४बुलडाणा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४९ टक्के पाऊस झाला आहे. तालुक्यात दररोज संततधार पावसाची हजेरी लागत असल्याने जवळपास २८ टक्के पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. बुलडाणा तालुक्यात सरासरी ७५ हजार ५०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५४ हजार ३८८ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३२ टक्के पाऊस पडला आहे.७५ हजार हेक्टरवर कडधान्याचा पेराजिल्ह्यात दोन लाख ८७ हजार ६०५ हेक्टरवर कडधान्य पेºयाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. त्यापैकी आतापर्यंत ९९ हजार ५०५ हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला आहे. यात ४९ हजार ७०८ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून उडीदाचा पेरा हा ११ हजार ७२६ हेक्टरवर झालेला आहे. दरम्यान तेलबियांचा पेरा हा दोन लाख ५० हजार ४२३ हेक्टरवर करण्यात आलेला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी