शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

खरीप पिकांनी माना टाकल्या

By admin | Updated: July 10, 2015 00:01 IST

जानेफळ येथील शेतक-यांना दमदार पावसाची प्रतीक्षा.

सय्यद साबीर/जानेफळ : पावसाने गेल्या १५ दिवसांपासून लंबी दडी मारल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. दुपारच्यावेळेला उन्हाळ्याप्रमाणे उन्ह तापत असल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. बहुतांश भागातील पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकर्‍यांना दमदार पावसाची प्र तीक्षा लागली आहे.मॉन्सूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाचे आगमन होऊन सलग दोन आठवडे समाधानकारक पाऊस झाला. त्यामध्ये परिसरातील नदीनाले दुथडी वाहू लागले. दरम्यान मृग नक्षत्रातच पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शेतकर्‍यांनी मोठय़ा लगबगीने १५ ते २0 जूनपर्यंत खरीप हंगामाची पेरणी केली. बर्‍याच वर्षानंतर मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने मूग, उडीदाचा पेरासुद्धा जानेफळ परिसरात झाला; परंतु गत १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. पेरणीनंतर जमिनीत असलेल्या ओलीवर पीक अंकुरुन जोमाने डोलू लागले; परंतु दुपारच्या वेळेला उन्हाळ्याप्रमाणे उन्ह तापत असल्याने खरीप पिकांना या उन्हाचा फटका बसत आहे. खरीप हंगामावर निसर्गाची अवकृपा राहत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सकाळच्या सुमारास ढगांची दाटन आकाशात होत असली तरी दिवस मावळ तीला जाताना मात्र कोरडाच जात आहे. वेदशाळेने वर्तविलेले पावसाचे अंदाजही फोल ठरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी आता पावसासाठी मंदिरामध्ये साकडे घालण्याकडे कल धरला आहे. पावसाअभावी पिके सुकत असल्याने तसेच परिसरात दुष्काळाचे ढग निर्माण झाल्याने जानेफळ येथील आठवडी बाजारातही शुकशुकाट दिसून येत आहे. या दुष्काळजन्य परिस्थितीचे सावट बाजारपेठेवर दिसून येत आहे. पावसाने मारलेल्या दांडीमुळे हजारो रुपयांची बी-बियाणे व रासायनिक खते मातीतच जातात की काय, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.