शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव : पाण्याअभावी होणार अनेक कारखाने बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:37 IST

खामगाव :  खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

ठळक मुद्देऔद्योगिक वसाहतीवर संकट

गजानन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये ३0 टक्केच पाण्याचा साठा असल्याने एप्रिल व मे  मध्ये पाण्याची चणचण भासु लागली आहे. औद्योगिक वसाहतीमधील नियमीत असलेला पाणी पुरवठा मागील पंधरवाड्यात तीन वेळा २४ तास बंद होता. त्यामुळे अनेक उद्योगांना झळ बसली. पाणी पुरवठा बंद होण्याचे कारण पाईपलाईन लिकेज तसेच तांदुळवाडी स्टोअरेजमध्ये पाणी नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु मुळात धरणातच पाणी साठा कमी असल्याने पाणी तोलून मापून देण्यात येत आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर, यश एन्टरप्राईजेस, व्हि.के.ऑईल मिल व अन्य कारखान्यांना दररोज हजारो लिटर पाणी लागत असते. परंतु यावर्षी पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस आणि पावसाळा जूनमध्ये सुरू न झाल्यास जुनमध्ये पाण्याचा खुप मोठा तुटवडा जाणवू शकतो. याचा परिणाम अनेक कारखाने पाण्याअभावी बंद पडू शकतात. अनेक कारखाने पाणी विकत घेऊन चालवत असतात. परंतु यावर्षी जीएसटी, नोटबंदी ह्यामुळे कॅशलेस व्यवहार असल्याने ते सुध्दा अडचणीचे ठरू शकते, असे काही कारखानदारांनी मत व्यक्त केले. 

सध्या पाणी पुरवठा नियमीत असून पावसाळा उशीरा सुरू झाल्यास पाणीटंचाई भासवू शकते. त्यामुळे पाण्याचा कारखानदारांनी जपून उपयोग करावा.- अविनाश डाबेरावउपविभागीय अभियंता एमआयडीसी खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी