शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

खामगाव : गारपीटग्रस्त भागाची कृषी मंत्र्यांकडून पाहणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:27 IST

खामगाव :  रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे  झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफ आणि विमा कंपनीच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पीकविमा न काढलेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देदोन दिवस सतर्कतेचा इशारा शासनाकडून तत्काळ मदतीची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  रविवारी बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटमुळे  झालेल्या नुकसानाची सोमवारी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांनी दोन दिवस सतर्कता बाळगण्याचे आवाहन करतानाच, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एनडीआरएफ आणि विमा कंपनीच्या माध्यमातून मदत दिली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पीकविमा न काढलेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून मदत दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.रविवारी अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे २७७ गावातील सुमारे ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला. या पार्श्‍वभूमीवर खामगाव तालुक्यातील विविध शेतीची पाहणी त्यांनी केली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, तालुका कृषी अधिकारी  एस.एस.ढाकणे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण,  तहसीलदार सुनील पाटील, शत्रुघ्न पाटील, डॉ.महाले, नायब तहसीलदार देशमुख, पिंपळगाव राजा येथील ठाणेदार सुरेंद्र अहिरकर उपस्थित होते. या पाहणी दौर्‍याला बोथा फॉरेस्ट येथून सुरुवात झाली. येथे हरिभाऊ कांडेलकर, शत्रुघ्न कांडेलकर आणि शालीग्राम सोनोने यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली.  त्यानंतर नांद्री येथील सोनाजी कोळपे यांच्या शेतातील पीक नुकसानाची पाहणी करण्यात आली. काळेगाव येथील मुकुंदा गायगोळ, बेलखेड येथील सुनील मुंडे, वर्णा येथील भरतसिंह इंगळे, गेरू माटरगाव येथील विजयसिंह साबळे, श्रीधरनगर येथील गजानन गिर्‍हे, मुकुंदा गायकवाड यांच्या शेताची पाहणी केली. यावेळी अधिकार्‍यांना तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत, कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी ज्ञानगंगापूर येथील अजय काशिनाथ महाले या युवकाच्या कुटुंबियांचे सात्वन केले. वादळीवार्‍यामुळे झाड अंगावर पडून अजय महाले याचा रविवारी मृत्यू झाला होता. 

खामगाव तालुक्यातील ६0 गावांमध्ये नुकसान! खामगाव तालुक्यातील ६0 गावांमधील पिकांचे रविवारी आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले. यामध्ये वर्णा, कोंटी, सारोळा, दिवठाणा, वझर, श्रीधरनगर, लोखंडा, किन्ही महादेव, चिंचपूर, हिवरा बु., नांद्री, लांजुड, पोरज, काळेगाव, निमकवळा, वडजी, कुंबेफळ, भालेगाव बाजार, टाकळी तलाव, कासारखेड, शिर्ला नेमाने, निरोड, हिवरखेड, आवार, कोलोरी, अडगाव, पलशी बु., सुटाला बु, वाडी, जयपूर लांडे, कोक्ता, माक्ता, शिरजगाव देशमुख, खुटपुरी, घाटपुरी, नांद्री, मांडणी, बोथा, शेंद्री, चिंचखेड बंड, खेर्डा, बेलखेड, कंचनपूर,  हिवरखेड, आवार, गेरु माटरगाव, झाडेगाव, लोणीगुरव, दत्तापूर, बोथाकाजी, सावखेड, भंडारी, उमरा, तरोडानाथ आदी गावांचा समावेश असून, शेगाव तालुक्यातील डोलारखेड, गुडगाव, वनगाव, कठोरा, चिंचखेड, भास्तन, सगोडा, हातखेड, पहुरपुर्णा, लासुरा, कासरखेड, जवला बु., जवला पलसखेड, चिंचोली, काटेपूर्णा, गौलखेड, खेर्डा आदी गावांसह सुमारे १८ गावांमध्ये नुकसान झाले. 

टॅग्स :Bhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरkhamgaonखामगाव