शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा, कोराडी प्रकल्प तहानलेलेच; दमदार पावसाची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:19 IST

बुलडाणा: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस पडला असला तरी पलढग वगळता जिल्ह्याती अन्य ९० प्रकल्प अद्यापही तहानलेले आहेत.

बुलडाणा: आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस पडला असला तरी पलढग वगळता जिल्ह्याती अन्य ९० प्रकल्प अद्यापही तहानलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे प्रकल्पातील जलसाठ्यांची माहिती घेतली असता मध्यम प्रकल्पात मोडणाºया कोराडी आणि तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात अद्यापही शुन्य टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील ९१ प्रकल्पामध्ये अवघा १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. दलघमीमध्ये विचार केल्यास तो ८८ दलघमी ऐवढाच आहे. जिल्ह्यातीची महत्तम पाणीसाठवण क्षमता ही ५३३.६ दलघमी असून त्याच्या तुलनेत फक्त १७ टक्केच पाणीसाठा प्रकल्पांमध्ये उपलब्ध असल्याने हे प्रकल्प भरण्यासाठी अद्यापही दमदार पावसाची जिल्ह्याला प्रतीक्षा आहे. दुसरीकडे अडीच महिन्यानंतर उन्हाळ््यातील पाणी आरक्षणाचे नियोजन यंत्रणेला करावे लागणार आहे. त्यादृष्टीने वर्तमान स्थितीतील पाणीसाठा हा अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्याील ११ पालिका व दोन नगर पंचायतींसह दीडशे पेक्षा अधिक गावांची पाण्याची तहान ही जिल्ह्यातील या प्रकल्पांद्वारे भागविली जाते. त्यासाठी जवळपास ४० दलघमी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करावे लागत असते. गेल्या वर्षी प्रकल्पातच पाणी नसल्याने जवळपास ३० पेक्षा अधिक पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी आरक्षणच करता आले नव्हते. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात येत्या दीड महिन्यात किमान वाढ होण्याची आस जिल्ह्याला लागून आहे. पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १२२.४३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा पावसाळ््यातच अवघा ८८ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळातील नियोजनाकडे प्रशासनाला लक्ष द्यावे लागण्याचे संकेत मिळत आहेत.

मोठ्या प्रकल्पात दहा टक्के जलसाठा

जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी मोताळा तालुक्यातील नळगंगा आणि मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पामध्ये वर्तमान स्थितीत सरासरी दहा टक्के जलसाठा उपलब्ध असून तो २३ दलघमी आहे. खडकपूर्णा प्रकल्पतर मृत पातळीच्याही खाली आहे. मध्यम प्रकल्पापैकी कोराडी प्रकल्पातही शुन्य टक्के पाणीसाठा असून अन्य सहा प्रकल्पामध्ये सरासरी २७ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पामध्ये १६ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील काळातील नियोजनासाठी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा होण्याची गरज असून त्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आतापर्यंत सरासरी ३५३ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर