शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या नोकऱ्या आल्या धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:59 IST

Jobs of teachers who failed TET are in danger : टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना आपल्या दहा ते बारा वर्षांच्या नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, याबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे टीईटी अनुत्तीर्ण अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना आपल्या दहा ते बारा वर्षांच्या नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. सेवेत असणारे शिक्षक वगळून नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.केंद्र शासनाच्या निर्णयानुसार शाळांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) बंधनकारक करण्यात आली. मात्र, या निर्णयामुळे सुमारे आठ ते दहा वर्षांपासून शाळांमध्ये नोकरी करणारे शिक्षक अडचणीत सापडले. राज्यातील तब्बल २० ते २५ हजार शिक्षकांना नोकरी गमवावी लागू शकते. त्यामुळेच राज्यातील उच्च न्यायालयामध्ये याबाबत विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात औरंगाबाद उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. परंतु, इतर उच्च न्यायालयांमध्येसुद्धा याबाबत स्वतंत्रपणे याचिका दाखल आहेत. टीईटी परीक्षा एकदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय नुकताच केंद्र शासनाने घेतला. त्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला. परंतु, टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते.   जिल्ह्यातील  अनेक शिक्षकांना या संदर्भातील निर्णयाचा फटका बसू शकतो.आठ शिक्षकांवर टांगती तलवार

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आठ प्राथमिक शिक्षकांविरुद्ध कारवाई शिक्षण विभागाने सुरू केली आहे़ या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले हाेते़ या आदेशाला टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले हाेते़ त्यावर न्यायालयाने शिक्षण विभागाच्या आदेशाला स्टे दिला हाेता़ या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे़ औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयच नागपूर खंडपाठीने कायम ठेवल्यास या शिक्षकांची सेवा समाप्त हाेणार आहे़ त्यामुळे, या आठ शिक्षकांवर टांगती तलवार आहे़ तसेच टीईटी अनुत्तीर्ण असलेले माध्यमिक शिक्षकांचीही सेवा समाप्त हाेण्याची शक्यता आहे़

जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आठ शिक्षकांच्या सेवा समाप्तीची प्रक्रीया सुरू केली हाेती़ त्यांनी मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली हाेती़ त्यावर न्यायालयाने स्टे दिला हाेता.  सहा महिन्यानंतर स्टेवर कारवाई न झाल्यास ताे रद्द हाेताे, असा निकाल सर्वाेच्च न्यायालयाने दिलेला आहे़  त्यानुसार शिक्षण संचालकांना या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची परवानगी मागितली आहे.  - सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक