शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिगाव: पुनर्वसनाच्या कामाने घेतला वेग; प्लॉटची मोजणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:11 IST

पुनर्वसन करावयाच्या ४७ गावांपैकी काही गावातील भुखंड वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढणाऱ्या जिगाव प्रकल्पातंर्गत पुनर्वसन करावयाच्या ४७ गावांपैकी काही गावातील भुखंड वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. त्यानुषंगाने पलसोडा येथे सध्या पुनर्वसन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून आहेत.दरम्यान, २३ जुलै रोजी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांनी जिगाव प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भातील कामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी पुनर्वसनाच्या कामांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचीत केले होते. जानेवारी २०२१ पर्यंत पहिल्या टप्प्यात पुनर्वसन करावयाच्या गावांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्रामुख्याने १३ गावातील कामे तथा प्लॉट वाटपास प्राधान्य द्यावयास सांगण्यात आले होते.त्यानुषंगाने २२ जुलै पासून पुनर्वसन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामास प्रारंभ केला आहे. खरकुंडी येथील काम सुरू झाले ््असून त्यात आलेल्या काही त्रुट्यांमुळे भूखंड वाटपात अडचणी येत आहेत. प्रारंभी येथील बाधीतांकडून अर्ज मागविण्यात आले होते. मलकापूरचे आमदार राजेश ऐकडे, प्रशासनाचे अधिकारी सध्या येथे भुखंड वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नागपंचमी सणानिमित्त हे काम बंद राहणार असल्याने २६ जुलै पासून पुन्हा ते सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. येत्या काळात जिगाव, पलसोडा, टाकळी वतपाळ येथील काम पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे बाधीत होणाºया कुुटुांंची संख्या सातहजार ९८० असून ९६ कुटुंबांचे आतापर्यंत पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास २४ कोटी रुपयांचा खर्च आला असून अद्यापही ४५ गावांचे खºया अर्थाने पुनर्वसन बाकी आहे. दुसरीकडे जिगाव प्रकल्पासाठी एकूण १७ हजार १३८ हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार असून त्यापैकी चार हजार २४९ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप १२ हजार ८८८ हेक्टर जमीन संपादीत करणे बाकी आहे. संपादीत जमिनीच्या मोबदल्यापोटी ५१७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून सध्या ५७६ कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असल्याची माहिती आहे. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांच्या निर्देशानुसार काम सुरू आहे.जानेवारी २०२१ पर्यंत प्लॉट वाटप करणारजिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बाधीत होणाºया ३२ गावातील नागरिकांच्या पूनर्वसनाच्या दृष्टीने प्लॉटची मोजणी करून त्याचे काम जानेवारी २०२१ पर्यंंत पुर्ण करावयाचे आहे. २३ जुलै रोजी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांनी घेतलेल्या आढाव्या दरम्यान, ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यानुषंगाने पुनर्वसन विभागाचे अधिकारी सध्या पलसोडा या गावात तीन दिवसापासून ठाण मांडून बसले आहेत.दोन गावांचे पुनर्वसन पुर्ण; ४५ गावांचे बागीजिगाव प्रकल्पातंर्गत ३२ गावांचे पुर्णत: आणि १५ गावांचे अंशत: असे एकूण ४७ गावांचे पूनर्वसन करावयाचे आहे. कोदरखेड गावाचे प्लॉट वाटपाचे काम पूर्णत्वास आले असून खरकुंडी गावाचे पुनर्वसन झाले आहे. ९६ कुटुंबांना त्याचा फायदा झाला आहे. पुनर्वसन करावयाच्या २२ गावापैकी नऊ गावांची कामे अद्याप सुरू झालेली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प