शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिगाव प्रकल्प :  सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे मिळणार सिंचनासाठी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 16:41 IST

सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत.

- नीलेश जोशीबुलडाणा: जिगाव प्रकल्पातंर्गत शेती सिंचनासाठी सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारेच पाणी उपलब्ध करण्यात येणार असून २००८ नंतर वाल्मी (वॉटर अ‍ॅन्ड लॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट, औरंगाबाद) यांनी केलेला अभ्यास व मध्यंतरी गठीत करण्यात आलेल्या चितळे समितीने प्रकल्पाच्या फेरनियोजनासंदर्भात दिलेल्या अहवालानंतरच याबाबीचा प्रकल्पातंर्गत अंतर्भाव करण्यात आला आहे. दरम्यान,  नऊ सप्टेंबर २०१९ ला प्रकल्पाच्या १३ हजार ७४८ कोटी रुपयाच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देतानांच ही अट टाकून त्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.प्रकल्पातंर्गतच्या १२ उपचास सिंचन योजनेतून कालव्याद्वारे जर एक लाख १६ हजार ५७० हेक्टरवर पाणी देण्याचा खर्च हा वर्षाकाठी ५० ते ६० कोटी रुपयांच्या घरात जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलआयोगाने प्रकल्पाला मान्यता देताना प्रकल्पावरून होणाºया सिंचनासाठी सुक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करण्याबाबत अट घातली होती. दरम्यान, त्यासंदर्भाने पर्यावरणीय अभ्यासही करण्यात आला असून सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे शेती सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत.जिगाव प्रकल्पातंर्गतच्या लाभ क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र हे खारपाणपट्यात येते तर उर्वरित ५० टक्के क्षेत्रापैकी बहुतांश भाग हा अवर्षण प्रवण आहे. प्रामुख्याने खामगाव तालुक्यातील पट्टा यात आहे. परिणामी कालव्याद्वारे पाणी दिल्या गेल्यास जमीनीचे खारपण वाढण्यासोबतच पाण्याचा अपव्यय होण्याची भिती होती. त्यामुळे जमीन अकृषक होऊन तिला पूर्वस्थिती आणण्यासाठीचा खर्चही अधिक येऊन येथे विविध पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले असते. त्या पार्श्वभूमीवर वाल्मी संस्थेला निमंत्रीत करून या भागातील पिक पद्धती, येथे कोणती पिके घेतल्या जावू शकतात व पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर कोणती पिके येथे घेतल्या जावू शकतात. याचा अभ्यास करण्यात येऊन सुक्ष्म सिंचन प्रणालीतंर्गतच शेती सिंचन या प्रकल्पातंर्गत अंतर्भूत करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प