शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नागरिकत्व विधेयकविरोधात जमीअत उलेमा-ए-हिंदचा निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 17:50 IST

धेयक घटनाविरोधी असल्याने ताबडतोब मागे घेण्याची मागणी जमीअत उलेमा-ए-हिंद च्या वतीने करण्यात आली आहे. 

संग्रामपूर: शेजारी देशांमधील शरणार्थींना धर्माच्या आधारे आपल्या देशामध्ये स्थान देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व विधेयक मंजूर करून त्यावर शिक्का मोर्तब केला असला तरी सदर विधेयक घटनाविरोधी असल्याने ताबडतोब मागे घेण्याची मागणी जमीअत उलेमा-ए-हिंद च्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी रोजी नागरिकत्व विधेयक विरोधात संग्रामपूर येथील जामा मस्जीत पासून तहसील पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. शांततेच्या मार्गाने हा मोर्चा तहसीलवर धडकला. तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत राष्ट्रपती यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या निषेध मोर्चात शेकडोंच्या संख्येने मुस्लिम समाजा सह इतर धर्मियांचीही उपस्थिती होती. नुकतेच राज्यसभेत केंद्र सरकारने नागरिकत्व विधेयक मंजूर केले. मात्र सदर विधेयक वादग्रस्त असल्याने जमियत उलेमा ए हिंद संघटना आक्रमक झाली. भारतीय संविधानात अनुच्छेद 14 व 15 नुसार कायद्यात भारतीय नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. तसेच राज्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीला कायद्यानुसार जात, धर्म, पंत यापासून भेदभाव करण्यास रोखण्यात आले असतानासुद्धा शासनाने धर्मावर आधारित विधेयक पारित करून घटना विरोधी कायदा लागू करण्याचा हट्ट धरला. असंवैधानिक घटनाविरोधी विधेयक असल्यामुळे लागू करण्यात येऊ नये अशी मागणी जमियत उलेमा ए हिंद या संघटनेकडून करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर विधेयक धर्मावर आधारित असून भारतीय संविधान विरोधात असल्याने महामहीम राष्ट्रपतींनी याकडे लक्ष देऊन हे विधेयक रद्द करावे अशी मागणी निवेदनातून राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. या निषेध मोर्चामध्ये मौलाना महेमूद, मुफ्ती समी, जकाउल्ला मौलाना, मौलाना जाफर, मौलाना शकील, शेख अफसर, मौलाना इरफान, अभय मारोडे, श्याम डाबरे, श्रीकृष्ण गावंडे, जावेद अली, मुशीर अली, शेख अफरोज, मौलाना आरिफ आदींचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक