शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

‘जलयुक्त शिवार’साठी जैन संघटनेचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:54 IST

मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये  रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे३ मार्चपासून राबविणार उपक्रम दुष्काळावर मात करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये  रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिकांच्या उत्पादनावरसुद्धा याचा परिणाम जाणवत आहे.  पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे  पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य  जनतेसह   शेतकर्‍यांना  याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना, पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळ उपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकर्‍यांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जेसीबी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची  उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हय़ातील ज्या गावात पाणीटंचाई आहे, अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील  पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे.  यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे.  यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादिया, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन जयचंद बाठिया यानी केले, तर आभार  नीलेश नाहाटा यांनी केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार