शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

‘जलयुक्त शिवार’साठी जैन संघटनेचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:54 IST

मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये  रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे३ मार्चपासून राबविणार उपक्रम दुष्काळावर मात करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीचा  सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहून जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी स्थानिक जैन स्थानकामध्ये  रविवारला नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिकांच्या उत्पादनावरसुद्धा याचा परिणाम जाणवत आहे.  पावसाळ्यात पडणारे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे  पावसाळ्यात पडणार्‍या पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य  जनतेसह   शेतकर्‍यांना  याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना, पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळ उपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकर्‍यांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जेसीबी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकीय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरुवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची  उपस्थिती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हय़ातील ज्या गावात पाणीटंचाई आहे, अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील  पाणी प्रश्न कायमचा मिटणार आहे.  यासाठी  जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे.  यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादिया, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन जयचंद बाठिया यानी केले, तर आभार  नीलेश नाहाटा यांनी केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार