शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आंतरजिल्हा बदलीतील शिक्षक स्व: जिल्ह्यात अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 17:41 IST

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेदरम्यान जवळपास १७२ आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी रॅन्डम पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे अनेक शिक्षक स्व जिल्ह्यात अडचणीत आले आहेत

ठळक मुद्देआंतरजिल्हा बदलीतील १७२ शिक्षकांसाठी रॅन्डम पध्दतीने निवड पध्दत राबविण्यात आली.पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग व दुर्धर आजाराचा विचार न केल्यामुळे त्यांना आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांची ‘आसमान से गिरे, खजूर पे लटके’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

- हर्षनंदन वाघ

बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेदरम्यान जवळपास १७२ आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसाठी रॅन्डम पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आल्यामुळे अनेक शिक्षक स्व जिल्ह्यात अडचणीत आले आहेत. त्यांच्याबाबत पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग व दुर्धर आजाराचा विचार न केल्यामुळे त्यांना आर्थिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे गेल्या अडीच महिन्यांपासून त्रांगडे सुरू असून पाचव्या फेरीनंतर आंतरजिल्हा बदलीतील १७२ शिक्षकांसाठी रॅन्डम पध्दतीने निवड पध्दत राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान आंतरजिल्हा बदलीतील काही मोजक्या शिक्षकांना शहराजवळ नियुक्त्या दिल्यामुळे कथितस्तरावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील जवळपास १०० पेक्षा जास्त शिक्षकांना जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यासह दुर्गम क्षेत्रातील शाळेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यातील अनेक शिक्षक पत्नी नोकरी करीत असलेल्या ठिकाणाहून तसेच बुलडाणा जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी राहून दररोज ३० ते ४० किलो मिटर अंतरावरील इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेवर नोकरीसाठी जात होते. यातील अनेक शिक्षक दिव्यांग तसेच दुर्धर आजार असल्यामुळे त्यांना बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या इतर जिल्ह्यातील जि.प.शाळेवर नियुक्ती देण्यात आली होती. मात्र यावर्षी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेदरम्यान स्व जिल्ह्यात येण्यासाठी जालना, जळगाव खान्देश येथील शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यापैकी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी १७२ शिक्षक पात्र ठरले. त्यापैकी बदलीप्रक्रियेच्या पाचव्या फेरीत १२५ शिक्षकांना रॅन्डम पध्दतीने नियुक्ती देण्यात आली. त्यामुळे जवळपास १०० शिक्षकांना दुर्गम क्षेत्रातील शाळेवर नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांमध्ये नाराजी पसरली असून त्यांची ‘आसमान से गिरे, खजूर पे लटके’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

बदल्यातील अनियमिततेचा फटका

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षक इतर जिल्ह्यातून स्व जिल्ह्यात आल्यामुळे त्यांना विशेष संवर्ग १ व २ च्या शिक्षकांप्रमाणे पती-पत्नी एकत्रिकरण, दिव्यांग, दुर्धर आजाराबाबतचे नियम न लावता रॅन्डम पध्दतीने सरळ नियुक्ती देण्यात आली आहे. कोणतेही नियम न पाळता बदली प्रक्रियेदम्यान मोठ्या प्रमाणात अनियमिततेचा फटकाही आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांना बसला आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक