शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३५७ नगर पालिका कर्मचाऱ्यांना  विमा कवच, सानुग्रह अनुदान लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 18:06 IST

राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना अखेर राज्य शासनाने विमा कवच आणि सहाय्यय सानुग्रह अनुदान लागू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोविड-१९ या विषाणूसंसर्गाच्या आपातकालीन परिस्थितीत लढणाºया राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना अखेर राज्य शासनाने विमा कवच आणि सहाय्यय सानुग्रह अनुदान लागू केले आहे. परिणामी, राज्यातील तब्बल ३५७ नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यात १४ मार्चपासून कोरोनाचा शिरकाव झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर  डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, महसूल कर्मचारी आपआपल्या परीने कोरोना योध्दे म्हणून लढताहेत. या कालावधीत महसूल, ग्रामविकास आणि आरोग्य कर्मचाºयांना सुरूवातीलाच विमा कवच दिले होते. उपरोक्त कर्मचाºयांच्या  सोबत सेवारत राहूनही पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे विमा कवच आणि सानुग्रह अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेने टप्प्या-टप्प्याने आंदोलन उभे केले. सुरूवातीला निवेदन, काळ्या फिती आंदोलन करूनही  न्याय न मिळाल्याने संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. शासनाचा कर्मचाºयाप्रती दूजाभाव कायम असल्याने कोविड-१९ या आपातकालीन परिस्थिती मुख्यमंत्री सहायता निधीला एक दिवसाचे वेतन देण्यासही पालिका कर्मचाºयांनी नकार दर्शविला. दरम्यान, तब्बल अडीच महिन्यानंतर राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना २९ मे रोजी विमा कवच आणि सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उशीरा का होईना राज्यातील पालिका कर्मचाºयांना न्याय मिळाल्याचे दिसून येते.

 राज्यातील २५ हजारावर सफाई कामगारांना न्याय!कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यू होणाºया कर्मचाºयांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य अनुदान लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाने अपर मुख्यसचिव (वित्त) यांच्या स्वाक्षरीने २९ मे रोजी अद्यादेश जारी केला आहे. यामध्ये नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचा राज्यातील २५ हजार सफाई कामगारांसोबतच हजारो कामगारांना होणार आहे.

 नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना विमा कवच आणि सानुग्रह अनुदान देण्यासाठी संघटनेने सुरूवातीपासूनच लढा दिला. या लढ्यात सुरूवातीपासूनच ‘लोकमत’चे योगदान महत्वाचे राहीले. संघटनेच्या रेट्यापुढे शासनाने ‘देर आये दुरूस्त आये’ या न्यायाने पालिका कर्मचाºयांना न्याय दिला आहे.- विश्वनाथ घुगेअध्यक्ष,महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटना.

टॅग्स :khamgaonखामगावEmployeeकर्मचारी