शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बैलांना विम्याचे कवच; शेतकरी अनभिज्ञ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:00 IST

बुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे.

ठळक मुद्देबोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांना या विम्याविषयी माहिती असल्याचे दिसून आले. पशुधन विमा योजनेची जनजागृती नसल्याचे चित्र समोर आले आहे. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे. पोळा सणाच्या पूर्वसंधेला माहिती घेतली असता  या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याने बैलांना विम्याचे कवच नावालाच राहत असल्याचे चित्र दिसून आले. शेतकºयांजवळ असलेली गाय, बैल, म्हैस, देशी व संकरीत दुभती जनावरे, शेळी, मेंढी व इतर पशुधन आकस्मिक तसेच नैसर्गीक संकटाने दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पशुधन दगावल्यास शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पशुधन विमा योजना सुरू केली आहे. ही योजना न्यू इंंडिया इन्शुरन्स कंपनी व शासन यांनी सामंजस्य करार करून दारिद्र्य रेषेखालील, बीपीएल, अनुसूचित जाती, जमाती व इतर प्रवर्गातील शेतकºयांना अतिशक कमी दरात पशुंची संख्या व प्रवर्गानुसार रक्कम ठरवून दिल्याने पशुपालकांसाठी ही योजना लाभदायी आहे. २०१६ मध्ये या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिले आहे. २०१७-१८ मध्ये पशुधन विमा योजनेसाठी केंद्र शासनाकडून दोन कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा मिळून तीन कोटी १३ हजार रुपये निधी पशुधन विकास महामंडळाकडे उपलब्ध करून दिला होता.  एक व तीन वर्षाचा पशुधनाचा हा विमा उतरविण्यासाठी पशुपालकांची मात्र उदासिनता दिसून येते. पोळा सणाच्या पूर्वसंधेला काही शेतकºयांना पशुधन विमा योजनेविषयी विचारणा केली असता बोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांना या विम्याविषयी माहिती असल्याचे दिसून आले. पशुधन विमा योजनेची जनजागृती नसल्याचे चित्र समोर आले आहे.  

टॅग्स :buldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्डFarmerशेतकरी