शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

इंदिरा, रमाई आवास योजनेचे तीनतेरा!

By admin | Updated: April 17, 2017 00:48 IST

संग्रामपूर तालुक्यातील चित्र : १३४ घरकुले अपूर्ण, तर तीन घरकुले रद्द

अमोल ठाकरे - संग्रामपूरसंग्रामपूर पंचायत समितीतर्फे इंदिरा आवास व रमाई आवास योजनेंतर्गत तीन वर्षांत तालुक्यासाठी १ हजार ४६ घरकुले देण्यात आली होती. त्यापैकी १३४ अपूर्ण आहेत, तर तीन घरकुले रद्द करण्यात आली आहेत. इंदिरा आवास व रमाई आवास योजनेच्या कक्षातील कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे व या विभागात अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे इंदिरा व रमाई आवास योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना इंदिरा आवास योजनेखाली घरकुल देण्याचे नियोजित आहे. यासाठी रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांपर्यंत तरतूद आहे. तर इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थीला ९५ हजारपर्यंत तरतूद आहे. सन २०१६-१७ मध्ये इंदिरा आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये करण्यात आलेले आहे.सन २०१४-१५ मध्ये पंचायत समितीला इंदिरा आवास योजनेचे ३६० घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३५० घरकुले पूर्णत्वास गेली असून, १० घरकुले ही अपूर्ण आहेत. तर २०१५-१६ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाचे ५३९ घरकुलांचे उद्दिष्टे होते. त्यापैकी ४२१ घरकुले ही सद्यस्थितीत पूर्णत्वास गेली असून, उर्वरित १०८ घरकुल लाभार्थींना प्रथम (अग्रिम) हप्ता देण्यात आला आहे, तर ३१ घरकुले ही सद्यस्थितीत अपूर्ण असून, ८४ घरकुलांचेही बांधकाम सुरू आहे. यातील पातुर्डा, वरवट खंडेराव, दुर्गादैत्य या गावातील प्रत्येकी १ घरकुल रद्द करण्यात आले आहे. सन २०१६-१७ मध्ये पंचायत समितीला रमाई आवास योजनेचा १४७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०० घरकुले लाभार्थींना प्रत्येकी ३५ हजार रुपये प्रथम हप्ता देण्यात आला आहे. तर ४७ लाभार्थींचे बँक खाते क्रमांक आॅनलाइन न झाल्यामुळे व आॅनलाइन तपासणी सुरु असल्यामुळे या लाभार्थींच्या घरकुलाचा प्रथम हप्ता अद्यापपर्यंत मिळाला नसल्यामुळे या लाभार्थींनी बांधकामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे ४७ घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी प्रथम हप्ता केव्हा मिळणार, यासाठी संबंधित लाभार्थी दररोज पंचायत समितीमध्ये चकरा मारत आहेत.गत तीन वर्षात रमाई आवास योजनेत ४७ घरकुल अपूर्ण आहेत. तर इंदिरा आवास योजनेचे सन २०१४-१५ मध्ये १० घरकुले अपूर्ण आहेत. सन २०१५-१६ मध्ये ७७ तर तीन घरकुले ही रद्द करण्यात आलेली आहेत. अपूर्ण राहिलेल्या घरकुलांकडे संबंधित स्थापत्य अभियंता, शाखा अभियंता व पं.स.च्या कनिष्ठ अभियत्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही घरकुले अपूर्ण राहिलेली आहेत. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.पंचायत समितीमधील अभियंत्यांची पदे रिक्त पंचायत समितीमध्ये स्थापत्य अभियंत्याची चार पदे मंजूर आहेत. पैकी १ स्थापत्य अभियंता कार्यरत आहे, तर शाखा अभियंत्याची दोन पदे मंजूर असून, एक शाखा अभियंता कार्यरत आहे. कनिष्ठ अभियंताची दोन पदे मंजूर असून, सद्यस्थितीत एक कनिष्ठ अभियंता कार्यरत आहे. ही सर्व महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकाचेही चार पदे मंजूर असून, कार्यरत फक्त एकच आहे. त्यामुळे या सर्व कामाचा व्याप एकाच स्थापत्य अभियांत्रिकी सहायकावर पडत आहे.