शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

रानभाज्यांचा मानवी आहारात समावेश महत्त्वाचा - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

मेहकर : रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन ...

मेहकर : रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन पिढीला त्यांची ओळखसुद्धा नाही. या रानभाज्यांचे मानवी आहारात असणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते दिलीप देशमुख यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन अंत्री देशमुख येथील कृषी सखी वर्षा देशमुख, रेखा गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजंगराव म्हस्के, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण गाडेकर, सुधाकर कंकाळ, उद्धव काळे, विनोद मोरे, कृषी पर्यवेक्षक राजूरकर, रमेश सुरुजुशे, अमोल सुळकर यांच्यासह सर्व कृषी सहायक, कृषिसेवक, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. बाजारात उपलब्ध होणाऱ्या भाज्या उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर होत आहे. त्यामुळे भाजी उत्पादनात वाढ होत आहे; परंतु भाजीची नैसर्गिक चव व प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात, तसेच बऱ्याच वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला व इतर औषध म्हणून उपयुक्त आहेत. याच रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे पौष्टिक व वैद्यकीय गुणधर्म जाणून घेण्यासाठी आदिवासी दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

या मेळाव्यात प्रामुख्याने करटोली, दिंडा, कुंदा, तरोटा, पाथरी, शेवगा, अंबाडी, केना, अळू, बांबू, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, भुईआवळा, उंबर, कवट, हडसन, तांदूळकुंद्रा इत्यादी भाज्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बाजारामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या उत्पादित करताना रासायनिक औषध व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ते हानिकारक आहे. यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या, तसेच आपल्या अवतीभोवती उत्पादित होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.

-वर्षा देशमुख, कृषी सखी, अंत्री देशमुख.