शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्यांचा मानवी आहारात समावेश महत्त्वाचा - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

मेहकर : रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन ...

मेहकर : रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन पिढीला त्यांची ओळखसुद्धा नाही. या रानभाज्यांचे मानवी आहारात असणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते दिलीप देशमुख यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन अंत्री देशमुख येथील कृषी सखी वर्षा देशमुख, रेखा गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजंगराव म्हस्के, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण गाडेकर, सुधाकर कंकाळ, उद्धव काळे, विनोद मोरे, कृषी पर्यवेक्षक राजूरकर, रमेश सुरुजुशे, अमोल सुळकर यांच्यासह सर्व कृषी सहायक, कृषिसेवक, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. बाजारात उपलब्ध होणाऱ्या भाज्या उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर होत आहे. त्यामुळे भाजी उत्पादनात वाढ होत आहे; परंतु भाजीची नैसर्गिक चव व प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात, तसेच बऱ्याच वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला व इतर औषध म्हणून उपयुक्त आहेत. याच रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे पौष्टिक व वैद्यकीय गुणधर्म जाणून घेण्यासाठी आदिवासी दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

या मेळाव्यात प्रामुख्याने करटोली, दिंडा, कुंदा, तरोटा, पाथरी, शेवगा, अंबाडी, केना, अळू, बांबू, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, भुईआवळा, उंबर, कवट, हडसन, तांदूळकुंद्रा इत्यादी भाज्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बाजारामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या उत्पादित करताना रासायनिक औषध व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ते हानिकारक आहे. यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या, तसेच आपल्या अवतीभोवती उत्पादित होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.

-वर्षा देशमुख, कृषी सखी, अंत्री देशमुख.