शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:04 IST

पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चार दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ६७.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस सुरू होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.रविवारी रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस होता. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५.६५ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर गेल्या २४ तासामध्ये १४.९ मि.मी. पाऊस झाला असून, दोन टक्याने वाढ यामध्ये झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात एकाच दिवशी ३६.९ मि.मी. व लोणार तालुक्यात ३१.६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत ६७.६० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. या संततधार पावसामुळे काही भागातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. १६ आॅगस्ट ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात ७.२ मि.मी., चिखली २८.६ मि.मी, देऊळगाव राजा १४.९, सिंदखेड राजा ३६.९, लोणार ३१.६, मेहकर २१.८, खामगाव ६.८, शेगाव ५.०, मलकापूर ६.५, नांदूरा ७.५, मोताळा ६.७, संग्रामपूर १५.३ व जळगाव जा. तालुक्यात ४.४. मि.मी. पाऊस झाला आहे.

पुरातून मुलगा बचावलापिंपळगाव सराई : सैलानी येथील नदीच्या पुरातून बाहेरगावचा १५ वर्षीय मुलगा वाहून गेला होता. परंतु जांभळीवाले बाबा दर्गाजवळ कैलास मिस्तरी, शे.अरबाज शे.अफसर, शे.सोहब शे.अफसर, शे.हारुण शे.सुलतान यांनी त्याला नदीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्या मुलाला नदीत वाहल्यामुळे डोक्याला मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या मुलासोबत त्याची आई होती. सैलानी दर्गा येथे मुलाच्या उपचारासाठी ते आले होते. या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सैलानी येथील तलाव पूर्णत: भरला असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे.

येळगाव धरण भरलेबुलडाणा तालुक्यातील येळगाव धरणही १०० टक्के भरले आहे. मागील वर्षीही हे धरण लवकरच ओव्हर फ्लो झाले होते. या धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

दोघांचे प्राण वाचलेबुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. परंतू एका युवकाने या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला असता, पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी वाहून गेली. सुदैवाने या पुरातून दोघांचे प्राण वाचले. पुरामुळे बुलडाणा-रायपूर रस्ता बंद झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस