शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:04 IST

पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चार दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ६७.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस सुरू होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.रविवारी रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस होता. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५.६५ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर गेल्या २४ तासामध्ये १४.९ मि.मी. पाऊस झाला असून, दोन टक्याने वाढ यामध्ये झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात एकाच दिवशी ३६.९ मि.मी. व लोणार तालुक्यात ३१.६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत ६७.६० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. या संततधार पावसामुळे काही भागातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. १६ आॅगस्ट ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात ७.२ मि.मी., चिखली २८.६ मि.मी, देऊळगाव राजा १४.९, सिंदखेड राजा ३६.९, लोणार ३१.६, मेहकर २१.८, खामगाव ६.८, शेगाव ५.०, मलकापूर ६.५, नांदूरा ७.५, मोताळा ६.७, संग्रामपूर १५.३ व जळगाव जा. तालुक्यात ४.४. मि.मी. पाऊस झाला आहे.

पुरातून मुलगा बचावलापिंपळगाव सराई : सैलानी येथील नदीच्या पुरातून बाहेरगावचा १५ वर्षीय मुलगा वाहून गेला होता. परंतु जांभळीवाले बाबा दर्गाजवळ कैलास मिस्तरी, शे.अरबाज शे.अफसर, शे.सोहब शे.अफसर, शे.हारुण शे.सुलतान यांनी त्याला नदीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्या मुलाला नदीत वाहल्यामुळे डोक्याला मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या मुलासोबत त्याची आई होती. सैलानी दर्गा येथे मुलाच्या उपचारासाठी ते आले होते. या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सैलानी येथील तलाव पूर्णत: भरला असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे.

येळगाव धरण भरलेबुलडाणा तालुक्यातील येळगाव धरणही १०० टक्के भरले आहे. मागील वर्षीही हे धरण लवकरच ओव्हर फ्लो झाले होते. या धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

दोघांचे प्राण वाचलेबुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. परंतू एका युवकाने या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला असता, पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी वाहून गेली. सुदैवाने या पुरातून दोघांचे प्राण वाचले. पुरामुळे बुलडाणा-रायपूर रस्ता बंद झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस