शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
3
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
4
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
5
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
6
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
7
"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य
8
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक; सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप
9
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
10
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
11
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
12
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
13
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
14
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
15
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
16
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
17
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
18
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
19
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
20
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:04 IST

पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चार दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ६७.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस सुरू होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.रविवारी रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस होता. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५.६५ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर गेल्या २४ तासामध्ये १४.९ मि.मी. पाऊस झाला असून, दोन टक्याने वाढ यामध्ये झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात एकाच दिवशी ३६.९ मि.मी. व लोणार तालुक्यात ३१.६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत ६७.६० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. या संततधार पावसामुळे काही भागातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. १६ आॅगस्ट ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात ७.२ मि.मी., चिखली २८.६ मि.मी, देऊळगाव राजा १४.९, सिंदखेड राजा ३६.९, लोणार ३१.६, मेहकर २१.८, खामगाव ६.८, शेगाव ५.०, मलकापूर ६.५, नांदूरा ७.५, मोताळा ६.७, संग्रामपूर १५.३ व जळगाव जा. तालुक्यात ४.४. मि.मी. पाऊस झाला आहे.

पुरातून मुलगा बचावलापिंपळगाव सराई : सैलानी येथील नदीच्या पुरातून बाहेरगावचा १५ वर्षीय मुलगा वाहून गेला होता. परंतु जांभळीवाले बाबा दर्गाजवळ कैलास मिस्तरी, शे.अरबाज शे.अफसर, शे.सोहब शे.अफसर, शे.हारुण शे.सुलतान यांनी त्याला नदीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्या मुलाला नदीत वाहल्यामुळे डोक्याला मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या मुलासोबत त्याची आई होती. सैलानी दर्गा येथे मुलाच्या उपचारासाठी ते आले होते. या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सैलानी येथील तलाव पूर्णत: भरला असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे.

येळगाव धरण भरलेबुलडाणा तालुक्यातील येळगाव धरणही १०० टक्के भरले आहे. मागील वर्षीही हे धरण लवकरच ओव्हर फ्लो झाले होते. या धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

दोघांचे प्राण वाचलेबुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. परंतू एका युवकाने या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला असता, पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी वाहून गेली. सुदैवाने या पुरातून दोघांचे प्राण वाचले. पुरामुळे बुलडाणा-रायपूर रस्ता बंद झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस