शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
3
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
4
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
5
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
6
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
7
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
8
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
9
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
10
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
11
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
12
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
13
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
14
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
15
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
16
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
17
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
18
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
20
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त

'कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या...'; आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा

By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 2, 2023 17:18 IST

पार्थीवाचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास : आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा

बुलढाणा : कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या... अशा किंकाळ्या, आक्रोशाने अपघाताच्या दुसऱ्या दिवशीही बुलढाणा हादरला. समृद्धी महामार्गावरील १ जुलैला झालेल्या अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी २४ जणांच्या पार्थीवाचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवासही मन हेलावणारा होता.

समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा नजीक झालेल्या खासगी बसच्या अपघातात २५ जणांचा कोळसा झाला. १ जुलैला पहाटे सर्व मृतदेह एकूण सात रुग्णवाहिकेने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतू कोणाचा मृतदेह कोणता हे ओळखणे सुद्धा अवघड. त्यामुळे प्रशासनाची परीक्षा सुरू झाला आहे. नातेवाईकांना मृतदेह कसे द्यायचे, अंत्यसंस्कार कसे करायचे हा मोठा प्रश्न प्रशासनासमाेर होता. अखेर सर्व पार्थिवावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. १ जुलैला दुपारपासूनच मृतकांच्या नातेवाईकांनी बुलढाणा गाठण्यास सुरूवात केली. दिवसभर नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.

२ जुलैला पहाटेपासूनच अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली. नातेवाईकांनीही सामान्य रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. जिकडे तिकडे किंकाळ्या अन् रडणेच एकायला येत होते. सकाळी आठ वाजताच शहरातील सर्व स्वर्गरथ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. १० वाजेपासून स्वर्गरथामध्ये सर्व मृतदेह ठेवण्याला सुरूवात झाली. ११ वाजेपर्यंत सर्व मृतदेह स्वर्गरथामध्ये ठेवण्यात आले. नंतर नातेवाईकांचा टाहो आणखी वाढला. स्वर्गरथामध्ये शव ठेवत असताना नातेवाईकांचा टाहो आणखी वाढला होता. नातेवाईकांनाही आपला व्यक्त कोणत्या स्वर्गरथात आहे, याची कल्पनाही करणे अवघड होते. त्यानंतर ११:१५ वाजता सुरू झाला पार्थीवाचा स्मशानभूमीकडचा प्रवास.

स्वर्गरथामागे आईची धाव...जिल्हा सामान्य रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये शव नेण्यासाठी सर्व शव स्वर्गरथात ठेवण्यात आले. स्वर्गरथ शव घेऊन रुग्णालयाच्या बाहेर पडत असताना एका आईने आक्रोश करत त्या स्वर्गरथामागेच धाव घेतली. काही अंतरावर जाऊन ती आई कोसळली. त्या मागे बाबाही यात माझाला मुलगा आहे का हो... असे म्हणून स्वर्गरथामागे धाव घेतात... मन हेलावणारे हे हृदयद्रावक दृश्य होते.

स्मशानापर्यंतचा हा प्रवास

२ जुलै रोजी सकाळी ११:१५ वाजता २४ मृतदेहांचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. चार स्वर्गरथांमधून हे शव बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातून त्रिशरण चौकातील स्मशानभूमीमध्ये नेण्यात आले. एकाचवेळी सर्व शव चिखलीरोडने जात असताना संपूर्ण वातावरण गंभीर झाले होते. प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत या मृतकांना अखेरचा निरोप देत होतं.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात