शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘बी’ ग्रेडच्या नावाखाली पाडतात केळीचे भाव; चक्क अर्ध्या दरात होतेय विक्री

By विवेक चांदुरकर | Updated: August 23, 2023 19:38 IST

व्यथा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या भाग १ - पर्याय नसल्याने विकावा लागतो शेतमाल

विवेक चांदूरकर

खामगाव : जिल्ह्यात अनेक शेतकर्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत फळबागांची लागवड केली आहे. मात्र, विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकर्यांची फसवणूक होत आहे. बी ग्रेड केळी असल्याचे कारण देत व्यापारी चक्क अर्ध्या किमतीत केळी खरेदी करीत असल्याने शेतकर्यांना मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात सोयाबिन व कपाशी मुख्य पिक आहे. मात्र, आता अनेक शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने केळी, पपइ, उस, संत्र्याच्या लागवड करण्यात येत आहेत. फळबागांची विक्री करण्यासाठी जिल्ह्यात मोठी बाजारपेठ नाही. फळबागा खरेदी करणारे जिल्ह्यात काही मोजकेच व्यापारी आहेत. परजिल्ह्यातील व्यापारी फळांची खरेदी करण्याकरिता येतात. व्यापारी स्वत: शेतामध्ये जावून केळीची खरेदी करतात. खरेदी करताना ‘ए’ व ‘बी’ ग्रेडमध्ये विभागणी करण्यात येते. ए ग्रेडच्या केळीला १२०० रूपये भाव मिळत असून, बी ग्रेड केळीला केवळ ५०० ते ६०० रूपये क्विंटल भाव मिळत आहे. केळीच्या घडाच्या खालील फणीला बी ग्रेड म्हणून कमी भाव देण्यात येतो. व्यापार्यांनी ठरविल्यानुसार शेतकर्यांना दर द्यावा लागतो. शेतकर्यांकडे दुसरा पर्याय नसल्याने नुकसान झाल्यावरही केळी त्याच भावात विकावी लागते.

व्यापारी ‘ए’ व ‘बी’ ग्रेड ठरवतात. बी दर्जाचा माल सांगून भाव कमी करतात. सध्या १२०० - १३०० रूपये क्विंटल भाव सुरू आहे. बी दर्जाचा भाव ६०० ते ६५० रूपये आहे. आपल्याकडे पर्याय नसल्याने व्यापारी सांगेल त्या भावात केळीची विक्री करावी लागते. बुलढाणा जिल्ह्यात मार्केट उपलब्ध व्हायला हवे.- नामदेव वाकूडकर, केळी उत्पादक शेतकरी, दिवठाणा

केळीची विक्री करताना एक नंबर व दोन नंबर ठरविण्यात येतात. बरेचदा चांगल्या केळीलाही व्यापारी दोन नंबरचे ठरवतात. त्यामुळे कमी भाव मिळतो. एक नंबरला १२०० रूपये तर दोन नंबरला फक्त ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटलच भाव मिळतो. विक्रीसाठी दुसरा पर्याय नसल्याने नाइलाजास्तव कमी भावात विकावे लागते.- केळी उत्पादक शेकरी, वरवट बकाल

टॅग्स :Farmerशेतकरीbuldhanaबुलडाणा