शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

दुकान जोरात चाललयं तर नवीन ग्राहकांची कमी नाही, नितीन गडकरींचे बुलढाण्यात मार्मिक टोले

By निलेश जोशी | Updated: August 19, 2023 00:12 IST

Nitin Gadkari: भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे.

- नीलेश जोशी 

बुलढाणा - भाजपाचा पाया हा जनसंघाच्या काळात मान, सन्मनाचा विचार न करता प्रवाहाच्या विरोधात विचार, देश आणि समाज हितासाठी झटणाऱ्यांच्या निष्ठेने रचला आहे. आज आमच ‘दुकान’ जोमात सुरू आहे. नवीन ग्राहकांची कमी नाही. अेारीजनल ग्राहक मात्र दिसत नाही, असा मार्मिक टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी बुलढाणा येथे लगावला.

निमित्त होते भाजपाचे माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे. शुक्रवारी गर्दे वाचणालयात झालेल्या या कार्यक्रमास खा. प्रतापराव जाधव, आ. संजय कुटे, श्वेता महाले, ॲड. आकाश फुंडकर, संजय रायमुलकर, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यासह अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या २१ मिनीटाच्या भाषणात त्यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करत राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही, असे ठणकावून सांगितले. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकास कारण असल्याचे ते म्हणाले. आज राजकारणाचा अर्थच वेगळा घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन ग्राहकच अधिक दिसत आहे. जुन्या निष्ठायावेळी गडकरींनी आजपर्यंतच्या भाजपाच्या वाटचालीचा धावता आढावा घेत जनसंघाच्या काळात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा नव्हती. परंतू तेव्हा विचार, देश आणि समाजकारणाच्या एका विशिष्ट धेय्यावर प्रतिकुलतेत निवडणुकात हार निश्चीत असतांनाही कार्यकर्ते निष्ठेने कार्यरत रहात होते. जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत केलेल्या कामामुळेच आज भाजप यशाच्या तथा सत्तेच्या शिखराव आहे. परंतू त्यामागे एक विचार होता. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे उत्तरदायित्व देण्याची भूमिका होती. त्यातूनच आपल्याला महामंत्री करण्यात आले होते. आज राजकारणाची व्याख्या बदलली आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण झाल्याचे ते म्हणाले. निस्वार्थ कार्यकर्त्यांनी स्वत:ला पक्षाच्या विचारात वाहून घेतल्यानेच आज पक्ष शिखरावर पोहोचला आहे. आमच दुकान चालायला लागल्यावर नवे कार्यकर्ते जोडल्या गेले. मात्र जुने फारसे दिसत नसल्याचा टोलाही वर्तमान राजकीय परिस्थितीवर त्यांनी लगावला, तेव्हा सभागृहात हास्याचे फवारे उडाले.

तरच विश्वगुरू बनूआज विश्वगुरू बनण्याची आपण कल्पना करत आहोत. त्यासाठी ज्ञान, विज्ञान, नव्या तंत्रज्ञानाला आपल्या संस्कार, शैक्षणिक मुल्यांधिष्ठीत संस्कारासोबत इतिहास, संस्कृती व वारश्याची सांगड घालून समाजाची पायाभरणी केल्यास विश्वगुरू बनण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. या माध्यमातून वर्तमानात नॉलेज टान्सफॉर्मेशन करत आपण जागतिक शक्ती केंद्र बनण्याची कुवत ठेवून आहोत, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाbuldhanaबुलडाणा