शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सरकारने शब्द फिरविल्यास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुन्हा दुध आंदोलनाचा भडका! - रविकात तुपकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 16:08 IST

बुलडाणा : दुधाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान प्रश्नी सरकारने शब्द फिरविल्यास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून स्वाभीमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारेल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकात तुपकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे१६ जुलैपासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेने राज्यात दुध अनुदान प्रश्नी आंदोलन सुरू केले होते.मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे स्वाभीमानी शेतकरी संघटना बारकाईने लक्ष ठेऊन आहे. शब्द फिरवला तर स्वाभीमानी राज्यात पुन्हा या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याचे तुपकर म्हणाले.

बुलडाणा : दुधाच्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान प्रश्नी सरकारने शब्द फिरविल्यास गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून स्वाभीमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारेल, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकात तुपकर यांनी दिला आहे. मुंबईत दुध प्रश्नी सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर ३१ जुलै रोजी दुध संघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनासोबत बैठक सुरू आहे. त्या पृष्ठभूमीवर रविकांत तुपकर यांनी हा इशारा दिला आहे. १६ जुलैपासून स्वाभीमानी शेतकरी संघटनेने राज्यात दुध अनुदान प्रश्नी आंदोलन सुरू केले होते. पाच दिवसांच्या या तीव्र आंदोलनानंतर शासनाने आंदोलकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून अनुषंगीक आश्वासन दिले होते. त्या पृष्ठभूमीवर एक आॅगस्ट पासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. प्रकरणी विविध दुध संघ व राज्यशासनाच्या प्रतिनिधींची मुंबईत ही बैठक सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. गायीच्या दुधाला प्रती लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे अर्थात प्रती लिटर २५ रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन पाच दिवस आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर राज्यशासनाने हा प्रश्न तडीस नेण्याची भूमिका दाखवली होती. त्यात गायीच्या दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान आणि निर्यात होणार्या दुधाच्या भुकटीवर प्रति किलोमागे ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी दुधाला लिटरमागे २५ रुपये भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे स्वाभीमानी शेतकरी संघटना बारकाईने लक्ष ठेऊन आहे. राज्य शासनाने आंदोलनानंतर दिलेला शब्द फिरवला तर स्वाभीमानी राज्यात पुन्हा या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याचे तुपकर म्हणाले. 

सरकार अनेक पातळ््यावर बॅकफुटवर

सध्याचे सरकार हे मराठा आरक्षणासह धनगर समाजाचे आरक्षण, नोकऱ्यांचा प्रश्न यासह अनेक प्रश्न सोडविण्यात अपेक्षीत असे काम करू शकले नाही. त्यामुळे अनेक मुद्द्यावर ते बॅकफुटवर आले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची तीव्रता त्यामुळे वाढली. दुधाला अपेक्षीत भाव न मिळाल्यास दुध उत्पादक शेतकर्यांचाही संयमाचा बांध सुटले. त्यामुळे प्रसंगी आणखी वेगळ््या पद्धतीने स्वाभीमानी शेतकरी संघटना आंदोलन पुकारेल, असे रविकांत तुपकर म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRavikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना