शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

मेरे पास सिर्फ माँ है !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

आम्ही तर वडिलांसोबत आजीआजोबाही गमावले... कुटुंबाचा आधार हे वडील असतात आणि हाच आधार गमावण्याची वेळ या कोरोनाने आमच्यावर आणली ...

आम्ही तर वडिलांसोबत आजीआजोबाही गमावले...

कुटुंबाचा आधार हे वडील असतात आणि हाच आधार गमावण्याची वेळ या कोरोनाने आमच्यावर आणली आहे. आम्ही केवळ वडीलच नाही, तर आजीआजोबाही गमावले आहेत. वडिलांच्या प्रेमाबरोबरच आजीआजोबाही आमच्यापासून दूर गेले. कधी बाहेर एकट्याने गेलो नाही. मात्र, आता ही वेळ कशी आली. वडिलांच्या प्रेमाबरोबरच रोजीरोटीही हिरावून नेली आहे. आता आम्हाला आईच आशेचा किरण आहे. पण, ज्यांच्या आईने कधी बाहेरील काम केले नाही, अशा मातोश्रींना मात्र आता उंबरठा ओलांडून बाहेर पडावे लागणार आहे. कुटुंबात नेहमी निर्णय घेण्याची जबाबदारी वडिलांची असते. पण, आम्ही वडीलच गमावल्याने ही जबाबदारीही आईवरच येणार आहे. मृतांमध्ये

कित्येक पती-पत्नी एकमेकांना सोडून गेले आहेत. याहीपेक्षा दु:खाची बाब म्हणजे, कित्येक लहानांचे पालकच त्यांच्यापासून हिरावून नेले आहेत.

आई-वडील दोघेही गमावले

कोरोनाने आई-वडील गेलेल्या अशा मुलांना फार मोठा धक्का बसला आहे. आता कोणाकडे त्यांनी मायेने पाहायचे आणि कोणाच्या कुशीत शिरायचे, या वास्तवाने दिवसेंदिवस त्यांना होणाऱ्या दु:खाची तीव्रता वाढतच आहे. आमच्यासारखेच गावात अन्य काही कुटुंबांमध्येही असेच दुःख आहे. ज्यांना काका-काकी, मामा-मामी, आत्या असे नातलग आहेत, त्यांना थोडीफार जमेची बाजू आहे. निदान, दोनवेळचे जेवण आणि कपडालत्ता तरी उपलब्ध होईल. परंतु, ज्यांना असे नातलग नाहीत, त्यांना फार मोठे दुःख सहन करावे लागणार आहे. समाजाने जरी अशांना सांभाळले तरी, झालेले दुःख पचविणे आणि येणारे दिवस घालविणे, हे खूपच कठीण आहे.

आईच्या मायेविना पोरके

आईशिवाय घराला घरपण येत नाही, असे म्हणतात, ते काही खोटे नाही. हट्ट पुरविण्यासाठी वडील जरी पैसे देत असले, तरी हट्ट हा नेहमी आईकडेच केला जातो. कोरोनाने आम्हाला आईच्या मायेला पोरके केले आहे. वडील असल्याने आम्हाला एक खंबीर आधार आहे. आम्हाला आईची उणीव भासू न देता संपूर्ण कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी वडिलांवर आली आहे. आर्ईविना घर सुनेसुने वाटत आहे. आईविना पुढील जीवन कसे कटणार, याची भीती आतापासूनच आमच्या मनात आहे. आई आपल्यासोबत आता कायमची नसणार आहे, याची जाणीव आम्हाला पदोपदी होत आहे. इतरांची आई पाहिल्यानंतर आम्हालादेखील आमची आई हवी होती. तिच्यावाचून आता संपूर्ण आयुष्य कसे जाणार? आपल्याला कोण मार्गदर्शन करणार, या विचाराने रात्रीची झोपच लागत नाही.

जिल्ह्यातील कोविड रुग्णांचा आढावा

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण रुग्ण - ८५४१५

बरे झालेले रुग्ण -८३५८४

सध्या उपचार सुरू असलेले - १२०२

एकूण मृत्यू - ६२६

१८ जणांचे छत्र हरपले

ज्या वयात लहान मुलांना आई-वडिलांचे प्रेम आवश्यक असते, त्याच वयात आई-वडिलांना गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोरोनाकाळात जिल्हा कृती दलामार्फत एकूण १८ बालकांचा शोध घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये ४ बालकांना आई-वडील नाहीत. या मध्ये २ मुली व २ मुले आणि १४ बालके ही कोरोनामुळे एक पालक झालेली आढळून आलेली आहेत. ज्यामध्ये ८ मुली व ६ मुले आढळून आलेली आहेत. या बालकांची प्राथमिक चौकशी सुरू असून त्यांना बालकल्याण समितीमार्फत पुढील पुनर्वसनासाठी हजर करण्यात येणार आहे.