शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पतीच निघाला पत्नीचा मारेकरी

By admin | Updated: May 25, 2015 02:30 IST

मलकापूर येथील खूनप्रकरण.

मलकापूर : अज्ञात इसमांनी पत्नीचा खून करुन आपणालाही मारहाण केली असा बनाव करणारा पतीच अखेर पत्नीचा मारेकरी निघाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला २३ मे रोजी दुपारी बहापुरा रेल्वे गेट जवळील मोरी खाली नेत दगडाने ठेचून तिचा निर्घूण खून केल्याचे उघडकीस आले असून यासंदर्भात मृतक विवाहितेच्या भावाने पोलिस स्टेशनला जावयाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृतकचा भाऊ गणेश शंकर रोहणकर रा.टुनकी ता.संग्रामपूर याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, बहीण लक्ष्मीण हिचे सन २00७ मध्ये एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी संजय वसंत सपकाळ रा.सावरगाव नेहू ता.नांदुरा यांचे सोबत विवाह झाला. पतीकडे नांदुत असतांना तिला पतीपासून ओम (वय ६) व सोहम (वय ३) अशी २ मुले झालीत. दरम्यान २३ मे रोजी सौ.लक्ष्मीला पती संजय सपकाळ याने दुचाकीवर बसवून गाडी सरळ रस्त्याने न नेता रेल्वे पुलाखाली नेवून लक्ष्मीला दगडाने मारहाण करुन तिचा खून केला व स्वत:च्या डोक्यावर दगड मारुन अज्ञात इसमांनी मारहाण करुन पतीचा खून करुन आपणालाही मारहाण केल्याचा बनाव निर्माण केला. या संशयास्पद घटनेने एकच गुंतागुंत निर्माण केली होती. घटनेची माहिती कळाताच पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतक लक्ष्मीचे प्रेत ताब्यात घेत संजय सपकाळ याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. दरम्यान पोलिसांनी जखमी संजय सपकाळला घटनेसंदर्भात विचारणा केली असता त्याने शेतीच्या वादावरुन रामकिसन निनाजी कांडेलकर व इतर दोघांनी रेल्वे पुलाजवळ माझी दुचाकी अडवून मला व माझ्या पत्नीला मारहाण केली व यातच पत्नी लक्ष्मी हिचा मृत्यू झाला व मी जखमी झाल्याची बनवाबनवी केली. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली असता पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृतक लक्ष्मीचा भाऊ गणेश लोणकर याने रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती संजय सपकाळ विरुध्द कलम ३0२,४९८ अ,भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.