शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

मराठा आरक्षणासाठी मोर्चे किती दिवस काढायचे? जरांगे पाटील यांच्या बहीणीचा बुलढाण्यात सवाल

By निलेश जोशी | Updated: September 13, 2023 19:09 IST

बुलढाणा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेच्या कार्यालयात मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

बुलढाणा: मराठा आरक्षणासाठी किती दिवस मोर्चे काढायचे. तीन पिढ्या गेल्या. असा काय गाढा अभ्यास आहे, जो सरकार करत आहे, असा प्रश्न बुलढाण्यातील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भगीनी भारतीताई कटारे यांनी उपस्थित केला आहे.

बुलढाणा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेच्या कार्यालयात मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांची बहीण सुवर्णा शिंदे आणि भाची अर्थात मनोज जरांगे पाटील यांची कन्या पल्लवी आणि राजर्षी शाहू परिवाराच्या मालती शेळके प्रामुख्याने उपस्थित होत्या. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्या आंदोलनामध्ये पूर्वीपासून सक्रीय आहेत.

यावेळी भारतीताई कटारे यांनी गोदा काठच्या (गोदावरी नदी काठच्या) १०३ गावांच्या प्रश्नासंदर्भाने प्रारंभी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. दरम्यान आंदोलन हे कुणबी प्रमाणपत्रासाठी नाही तर आरक्षण सरसगट हवे यासाठी आहे. आपले भाऊ सगळ्यांच्या न्यायासाठी उपोषणास बसले आहेत, असे त्या म्हणाल्या. उद्या जर काही कमीजास्त झाले तर त्यास सरकार जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तरुणांनी वेगळे पाऊल उचलू नयेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज भैय्या उपोषणास बसले आहे. तुमच्यासाठीच हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील तरुणांनी वेगळे पाऊल उचलून आत्मघात करून घेऊ नये. आरक्षण मिळाल्यानंतर तुम्ही त्याचे लाभ घेतांना मनोज जरांगे पाटील यांना तुम्हाला बघायचे आहे. त्यामुळे समाजातील तरुणांनी तथा अन्य व्यक्तींनी आत्मघात करणारे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहनही भारतीताई कटारे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण