शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:06 IST

शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : शहरासह तालुक्याला जलसंकृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. लोणार तालुक्यात अनेक जुने बारव, विहिरी, आड, तलाव ऐतिहासिक वारसा आहेत. मात्र मानवी हस्तक्षेप होत असल्याने ही जलसंस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे.अतिक्रमण, प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पाण्यावर जलपर्णी वाढली आहे. दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश हे जलपर्णी वाढण्यासाठी मदत करतात. ही वनस्पती या दूषित खाद्यावरच जगते. यामुळे डासांचे प्रमाण वाढून आजारांना निमंत्रण मिळत आहे. लेंडी तलावामध्ये जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेत असल्याने व पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी सुद्धा हे धोकादायक ठरते. पिंपळखुटा रोडवरील ऐतिहासिक बारव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इतिहास संशोधक डॉ.प्रा. सुरेश मापारी यांनी लोणारला जलसंस्कृतीचा वारसा असल्याचे अनेक पुराव्यासह स्पष्ट केले आहे. शहराच्या जवळ असलेला लेंडी तलाव नावाने ओळख असलेल्या तलावाला नागार्जुन तलाव, लिंबी तलाव नावानेहही ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या तलावात अनेक वर्षापासून शहराचे घाण सांडपाणी सोडले जात आहे. ऐतिहासिक वारसा असलेला लेंडी तलाव संवर्धन करणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढलेला आहे हे आपण ओळखले पाहिजे. जलपर्णी काढण्याबरोबर या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय पदार्थांचे पाण्यात मिसळणे थांबवावयास हवे.- अरुण मापारी, पर्यावरण मित्र, लोणार.

टॅग्स :Lonarलोणारbuldhanaबुलडाणा