शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

गारपिटीचे संकट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात चौथ्या दिवशीही पाऊस.

खामगाव : सतत चौथ्या दिवशीही जिल्ह्यावर गारपीट व अवकाळी पावसाचे संकट कायमच आहे. मंगळवारी रात्री घाटावरील तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले, तर बुधवारी दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारा कोसळल्या. सतत तीन वर्षांपासून संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असतानाच आता अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगामही पूर्णपणे बाधित झाला आहे. जवळच असलेल्या निपाणा येथील कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बांधलेले किचनशेड २ मार्च रोजी परिसरात झालेल्या वादळी वार्‍यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या साहित्यांचे नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांवर शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जी.जे. गवई यांनी झालेल्या नुकसानासंदर्भात सरपंचपती दिलीप राणे, पोलीस पाटील गजानन झनके, नामदेव चौधरी, रमेश भोटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कानावर माहिती देऊन झालेल्या नुकसानासंदर्भात पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बीचे गहू, कांदा, कांदा बियाणे या पिकांसोबतच संत्रा, मोसंबी, लिंबू अशा फळबागांना सुद्धा फटका बसत आहे. २ मार्च रोजी खामगाव तालुक्यातील चिंचपूर परिसरात दुपारी २.३0 ते ३.३0 असा एक तास अवकाळी पाऊस बरसला. सोबतच अर्धातास हरभर्‍याच्या आकाराएवढी गारपीट झाली. या गारपिटीमुळे चिंचपूर येथील कैलास निर्मळ यांचे कांदा बियाणे, ज्ञानेश्‍वर कदम, तुकाराम शेळके, आत्माराम कदम, विजय शेळके, श्रीधर देशमुख यांच्या संत्राबागेचे नुकसान झाले. तर गोविंदराव देशमुख यांच्या गहू पिकाचे पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे नुकसान झाले. हा अवकाळी पाऊस व गारपीट परिसरातील पिंप्री कोरडे, तोरणवाडा, असोला नाईक, धोत्रा, किन्ही नाईक परिसरातही झाली. एकूणच शेतीपिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका सुरुच असून, कोरडवाहू हंगामासोबत रब्बी पिकांची नासाडीसुद्धा नैसर्गिक चक्र बदलत असल्याने होत आहे.