शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचे संकट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात चौथ्या दिवशीही पाऊस.

खामगाव : सतत चौथ्या दिवशीही जिल्ह्यावर गारपीट व अवकाळी पावसाचे संकट कायमच आहे. मंगळवारी रात्री घाटावरील तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले, तर बुधवारी दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारा कोसळल्या. सतत तीन वर्षांपासून संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असतानाच आता अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगामही पूर्णपणे बाधित झाला आहे. जवळच असलेल्या निपाणा येथील कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बांधलेले किचनशेड २ मार्च रोजी परिसरात झालेल्या वादळी वार्‍यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या साहित्यांचे नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांवर शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जी.जे. गवई यांनी झालेल्या नुकसानासंदर्भात सरपंचपती दिलीप राणे, पोलीस पाटील गजानन झनके, नामदेव चौधरी, रमेश भोटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कानावर माहिती देऊन झालेल्या नुकसानासंदर्भात पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बीचे गहू, कांदा, कांदा बियाणे या पिकांसोबतच संत्रा, मोसंबी, लिंबू अशा फळबागांना सुद्धा फटका बसत आहे. २ मार्च रोजी खामगाव तालुक्यातील चिंचपूर परिसरात दुपारी २.३0 ते ३.३0 असा एक तास अवकाळी पाऊस बरसला. सोबतच अर्धातास हरभर्‍याच्या आकाराएवढी गारपीट झाली. या गारपिटीमुळे चिंचपूर येथील कैलास निर्मळ यांचे कांदा बियाणे, ज्ञानेश्‍वर कदम, तुकाराम शेळके, आत्माराम कदम, विजय शेळके, श्रीधर देशमुख यांच्या संत्राबागेचे नुकसान झाले. तर गोविंदराव देशमुख यांच्या गहू पिकाचे पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे नुकसान झाले. हा अवकाळी पाऊस व गारपीट परिसरातील पिंप्री कोरडे, तोरणवाडा, असोला नाईक, धोत्रा, किन्ही नाईक परिसरातही झाली. एकूणच शेतीपिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका सुरुच असून, कोरडवाहू हंगामासोबत रब्बी पिकांची नासाडीसुद्धा नैसर्गिक चक्र बदलत असल्याने होत आहे.