शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

गारपिटीचे संकट कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2016 02:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात चौथ्या दिवशीही पाऊस.

खामगाव : सतत चौथ्या दिवशीही जिल्ह्यावर गारपीट व अवकाळी पावसाचे संकट कायमच आहे. मंगळवारी रात्री घाटावरील तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले, तर बुधवारी दुपारी खामगाव, मलकापूर तालुक्यात अवकाळी पावसासह गारा कोसळल्या. सतत तीन वर्षांपासून संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला यावर्षी दुष्काळाचा सामना करावा लागत असतानाच आता अवकाळी पावसामुळे रब्बीचा हंगामही पूर्णपणे बाधित झाला आहे. जवळच असलेल्या निपाणा येथील कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बांधलेले किचनशेड २ मार्च रोजी परिसरात झालेल्या वादळी वार्‍यामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे शालेय पोषण आहाराच्या साहित्यांचे नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांवर शालेय पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जी.जे. गवई यांनी झालेल्या नुकसानासंदर्भात सरपंचपती दिलीप राणे, पोलीस पाटील गजानन झनके, नामदेव चौधरी, रमेश भोटे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या कानावर माहिती देऊन झालेल्या नुकसानासंदर्भात पाहणी केली. या अवकाळी पाऊस व गारपिटीने रब्बीचे गहू, कांदा, कांदा बियाणे या पिकांसोबतच संत्रा, मोसंबी, लिंबू अशा फळबागांना सुद्धा फटका बसत आहे. २ मार्च रोजी खामगाव तालुक्यातील चिंचपूर परिसरात दुपारी २.३0 ते ३.३0 असा एक तास अवकाळी पाऊस बरसला. सोबतच अर्धातास हरभर्‍याच्या आकाराएवढी गारपीट झाली. या गारपिटीमुळे चिंचपूर येथील कैलास निर्मळ यांचे कांदा बियाणे, ज्ञानेश्‍वर कदम, तुकाराम शेळके, आत्माराम कदम, विजय शेळके, श्रीधर देशमुख यांच्या संत्राबागेचे नुकसान झाले. तर गोविंदराव देशमुख यांच्या गहू पिकाचे पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे नुकसान झाले. हा अवकाळी पाऊस व गारपीट परिसरातील पिंप्री कोरडे, तोरणवाडा, असोला नाईक, धोत्रा, किन्ही नाईक परिसरातही झाली. एकूणच शेतीपिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका सुरुच असून, कोरडवाहू हंगामासोबत रब्बी पिकांची नासाडीसुद्धा नैसर्गिक चक्र बदलत असल्याने होत आहे.