शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन मोठ्या दुर्घटना घडूनही खडकपूर्णा पूल कठड्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 12:40 IST

देऊळगावराजा : तालुक्यातील बहुचर्चित खडकपूर्णा पुल अद्यापही वर्षानुवर्षापासून कठड्याविनाच असून, यापुर्वी झालेल्या दोन मोठ्या दुर्घटनांकडे संबंधित विभागाने डोळेझाक केल्याने या पुलावर अपघाताची शक्यता वाढीस लागलेली आहे.

ठळक मुद्देदेऊळगाव मही ते टाकरखेड भागिले दरम्यान खडकपूर्णा नदीवरचा पूल हा ब्रिटीश राजवटीत तयार करण्यात आला. पुर्वीच्या राज्य महामार्गावर व आताच्या नवीन रचनेत राष्ट्रीय महामार्गावर हा पूल आहे.खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाच्या निर्मितीमुळे पावसाळ्यात पुलावरुन पूर जात नाही.

- अर्जूनकुमार आंधळे

देऊळगावराजा : तालुक्यातील बहुचर्चित खडकपूर्णा पुल अद्यापही वर्षानुवर्षापासून कठड्याविनाच असून, यापुर्वी झालेल्या दोन मोठ्या दुर्घटनांकडे संबंधित विभागाने डोळेझाक केल्याने या पुलावर अपघाताची शक्यता वाढीस लागलेली आहे. देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही ते टाकरखेड भागिले दरम्यान खडकपूर्णा नदीवरचा पूल हा ब्रिटीश राजवटीत तयार करण्यात आला. पुर्वीच्या राज्य महामार्गावर व आताच्या नवीन रचनेत राष्ट्रीय महामार्गावर हा पूल आहे. या पुलावरुन नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर सह इंदोर (मध्यप्रदेश) तर दुसरीकडे जालना, औरंगाबाद, सांगली, बीड, नाशिक, पुणे, मुंबई शहराकडे एस.टी. बसेस, खाजगी बसेस व मालवाहू ट्रकची दररोज शेकडोंच्या संख्येने वाहतूक होत असते. खडकपूर्णा (संत चोखासागर) धरणाच्या निर्मितीमुळे पावसाळ्यात पुलावरुन पूर जात नाही. धरण बांधकामाच्या पुर्वी अनेकदा पावसाळ्यात या पुलावरुन पूर जात असल्याने दहा ते पंधरा तास वाहतूक ठप्प होत होती. अंदाजे ३५ ते ३८ वर्षापुर्वी याच पुलावरुन पूर वाहत असताना सोलापूरहून मलकापूरकडे जाणाºया बसच्या चालकाने प्रसंगावधान न राखता रस्ता पार केल्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने व चालकाचे मनोधैर्य खचल्याने अखेर बस प्रवाशांसह पुरात वाहून गेली. यात बसच्या चालक-वाहकासह निष्पाप प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसरी घटना याच पुलावर २५ वर्षापुर्वी घडली होती. चिखली ते देऊळगावराजा मार्गावर प्रवाशी वाहतूक करणारा मॅटेडोअर प्रवाशी घेऊन दे.राजाकडे येत असताना पुलावरुन पुराचे पाणी वाहत होते. मॅटेडोअरच्या चालकाच्या चुकीमुळे व पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने मॅटेडोअर प्रवाशांसह पुरात कोसळला. या दुर्दैवी घटनेत ७ ते ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमधून संबंधित विभागाने सतर्क होणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच न झाल्याने पुल आहे त्याच स्थितीत आजही उभा आहे. नाही म्हणता या पुलाच्या बाजुला नवीन समांतर पुलाचे निर्माण अंदाजे ८ वर्षापुर्वी करण्यात आले. मात्र त्या पुलावरुन वाहतूक अद्यापही सुरू झालेली नाही. पुढे खामगाव ते जालना या रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याने सध्याही ब्रिटीश राजवटीत तयार झालेल्या जुन्या पुलावरुनच वाहतूक सुरू आहे. या पुलावर सर्वात जास्त धोका देऊळगावराजाहून चिखलीकडे जाणाºया वाहनांना आहे. कारण या वाहनांच्या डाव्या बाजुला पुलाचा अंतीम भाग हा कठड्याविनाच आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeulgaon Rajaदेऊळगाव राजाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर