शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हनुमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता, वान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 15:48 IST

संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

संग्रामपूर (बुलडाणा) : वारी हनुमान येथील हनुमान सागर धरणाचे दरवाजे सोमवारी संध्याकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत उघण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक वाढल्याने सोमवारी दुपारपर्यंत धरणात ६२ टक्के जलसाठा झाला आहे. संध्याकाळ पर्यंत जलसाठ्यात वाढ होणार असल्याने वान प्रकल्पाच्या मंजूर जलाशय परिचालन सुची नुसार प्रकल्पामध्ये जुलै अखेरीस ६१.४४ टक्के जलसाठा निश्चित केला आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत धरणाची दरवाजे उघडली जाणार आहेत.

रविवारी धरण पाणलोट क्षेत्रात ४७ मिमि पावसाची नोंद झाली असून सोमवारी दिवसभरापासून कोसळधार सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येत्या काही तासात धरणाचे दरवाजे उघडून वान नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मंजूर जलाशय परिचालन सूचीनुसार धरणात जलसाठा वाढला आहे. रात्री उशिरापर्यंत हनूमान सागर धरणाचे दरवाजे उघडण्याची दाट शक्यता आहे. त्या पृष्ठभूमीवर वान नदीकाठच्या गावातील नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा वान प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षा कडून देण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा