शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यात गारपिटीने ६0 गावांतील पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:07 IST

वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, तालुक्यातील सुमारे १४ हजार हजार १२५ हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे.

ठळक मुद्दे१४ हजार १२५ हेक्टरवरील पिकांची हानी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : अस्मानी  आणि सुलतानी संकटांचा सातत्याने सामना करणार्‍या शेतकर्‍यांपुढे संकटाची एकापाठोपाठ एक मालिकाच जणू नियतीने लावली आहे. या मालिकेतीलच अस्मानी संकट घेऊन उजाडलेली ११ फेब्रुवारीची पहाट शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेणारी ठरली असून, वादळी वारा आणि तुफान गारपिटीसह आलेल्या पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकांसह फळबागा आणि भाजीपाल्याच्या पिकांना मोठय़ा प्रमाणावर बाधा पोहचून अतोनात नुकसान झाले आहे. या गारपिटीचा तालुक्यातील ६0 गावांना तीव्र तडाखा बसला असून, चिखली तालुक्यातील सुमारे १४ हजार हजार १२५ हेक्टरवरील पिकांची मोठी हानी झाली आहे.चिखली शहर व तालुक्यात सर्वत्र ११ फेब्रुवारी रोजी पहाटे सोसाट्याचा वार्‍यासह झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरासह तालुक्यातील ६0 गावांत बोरा एवढय़ा गारा पडल्याने शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, मका, हरभरा ही पिके आडवी पडली आहेत. तर अत्यंत नाजूक समजल्या जाणारे व तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर घेतले जाणारे कांदा बियाणे पिकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. याशिवाय द्राक्ष, डाळिंब व आंबा या फळबागांना मोठी हानी पोहचली आहे. तालुक्यातील काही भागात आंब्याला मोहर फुटलेला होता तर काही भागात बारीक कैर्‍यादेखील लागल्या होत्या. मात्र, आज सकाळच्या या तीव्र गारपिटीत मोहरलेल्या आंब्याची फुले व कैर्‍यांचा सडा पडलेला दिसून आला. हीच परिस्थिती द्राक्ष व डाळिंब बागांची असून, द्राक्ष बागांतील द्राक्षांचे घड तुटून पडले तर द्राक्ष वेलांनाही मोठी हानी पोहचली आहे. याशिवाय टरबूज, खरबूज, पपई, पेरू, संत्रा, पानतांड्यांनाही मोठी हानी पोहचली असून, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.  गहू व हरभरा काढणीला आला असताना गारपिटीने ही पिके आडवी पडली असल्याने रब्बी हंगामावर अवलंबून असलेले शेतकरी कोलमडला आहे. तर गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास या पावसाने व गारपिटीने हिरावून नेल्याने शेतकरी पार हादरून गेला आहे. दरम्यान, या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाच्या प्राथमिक पाहणी अहवालानुसार चिखली, हातणी, धोडप, कोलारा, शेळगाव आटोळ, चांधई, एकलारा व पेठ या महसूल मंडळातील गावांना बसली असून, या दोन महसूल मंडळात गावांना तीव्र फटका बसला. गहू २ हजार ८५२ हेक्टर, हरभरा ९ हजार ८८८.५ हे., फळबागा २५९.४ हे., भाजीपाला पिके २४८ हे., व इतर ७२६ हेक्टर असे एकूण १४ हजार १२५ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आजच्या गारपिटीने तालुक्यातील सवणा, शेलूद, सोमठाणा, दिवठाणा, बेलदरी, गिरोला, चिखली, वळती, पळसखेड जयंती, पेठ, बोरगाव वसू, शिंदी हराळी, धोत्रा भनगोजी, उदात्रा, शेलोडी, चांधई, पळसखेड दौलत, गोद्री, येवता, बोरगाव काकडे, आन्वी, मुंगसरी, शेलगाव जहा., अमोना, कोनड, इसरूळ, मंगरूळ, अंचरवाडी, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, पिंपळवाडी, देऊळगाव घुबे, भालगाव, गांगलगाव, धोडप, चांधई, कारखेड, डोंगरशेवली, पळसखेड सपकाळ, बेलखेड आदी ६0 गावातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पहाटे गारपीट झाल्यानंतर आमदार राहुल बोंद्रे व प्रशासनाच्यावतीने तहसीलदार मनीषकुमार गायकवाड व अधिकारी वर्गाने तातडीने तालुक्यात नुकसानाची पाहणी केली असून, तहसीलदारांनी तातडीने नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबधितांना दिले आहे. 

एकरी २५ हजार नुकसान भरपाई द्या - राहुल बोंद्रेतालुक्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीची पाहणी आमदार राहुल बोंद्रे यांनी तहसीलदार मनीष गायकवाड व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांसमवेत केली. तालुक्यातील विविध गावातील पिकांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर झालेल्या प्रचंड नुकसानातून शेतकरी सावरणे गरजेचे असल्याने शासनाने तातडीने संबंधित विभागाला आदेश देऊन झालेल्या नुकसानाची मोजणी करावी व शेतकर्‍यांना एकरी किमान २५ हजार रुपयांची तर फळ पीक व इतर पिकांना आवश्यक त्या प्रमाणात मदत तातडीने द्यावी, अशी मागणी केली आहे.

नुकसान भरपाई देण्याची रयत क्रांती संघटनेची मागणीवादळी वार्‍यासह गारपीट व पावसामुळे गहू, हरभरा, यासह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्याने या नुकसानाचा तातडीने पंचनामा करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी केली आहे.

जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करणार - श्‍वेता महाले चिखली तालुक्यात वादळी वार्‍यासह गारिपटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून जि.प. सभापती श्‍वेता महाले यांनी शेतकर्‍यांना धीर देत तालुक्यातील शेतकर्‍यांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Chikhliचिखली