शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

भूजल पातळी दीड मीटरने खालावली!

By admin | Updated: November 24, 2015 01:31 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा वाढला.

नीलेश जोशी / खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणावर वाढला असतानाच सलग दोन वर्षांपासूनच्या अवर्षणामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली असून, ती साडेचार मीटरवर पोहोचली आहे. परिणामी, जानेवारीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता तीव्रतेने जाणवण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १३७ गावात भूजलाचा बेसुमार उपसा वाढल्याने या भागात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहिरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील स्थितीही येत्या काळात बिकट बनणार आहे. दुसरीकडे देऊळगावराजा, लोणार, मेहकर आणि सिंदखेडराजा या घाटावरील चार तालुक्यात ही भूजल पातळी दोन मीटरपेक्षा अधिकने खाली गेल्यामुळे डिसेंबरअखेरच या भागात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता या भागात उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्हय़ाची गेल्या पाच वर्षांंची सरासरी भूजल पातळी ही ६.२१ मीटर आहे. त्या तुलनेत ऑक्टोबर २0१५ मध्ये १६७ निरीक्षण विहिरींच्या पाहणीनंतर सरासरी भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली आहे. वरकरणी असे दिसत असले तरी परतीचा पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पडला असला तरी नैसर्गिक पुनर्भरण या पावसात अत्यंत कमी झाल्याने आहे त्या पेक्षाही भूजल पातळी खोल असावी, अशी शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

*दोन तालुक्यात उपसा अधिक

घाटाखालील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यात भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील १३७ गावात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहीर, कूपनलिका, विंधन विहीर खोदण्यावर महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ नुसार बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रापैकी संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाणलोट क्षेत्रात उपसा बेसुमार वाढल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.

*२0 टक्केच पाणी

नैसर्गिकरीत्या पडणार्‍या पावसाच्या पाण्यापैकी एक लाख ९५१ हेक्टर मीटर पाणी जमिनीत मुरत आहे तर पाच हजार १५१ हेक्टर मीटर पाणी नैसर्गिकरीत्या वाहून जात आहे. त्या तुलनेत ६५ हजार ९३६ हेक्टर मीटर पाण्याचा उपसा जिल्ह्यात होत आहे. परिणामी, उरलेल्या २९ हजार ८६४ हेक्टर मीटर पाण्यापैकी केवळ ३0 टक्केच भूजलाचा वापर करता येण्यासारखा आहे. त्यापैकी १0 ते १५ टक्केच पाणी प्रत्यक्षात आपण उपसू शकत नाही.