शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

भूजल पातळी दीड मीटरने खालावली!

By admin | Updated: November 24, 2015 01:31 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा वाढला.

नीलेश जोशी / खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणावर वाढला असतानाच सलग दोन वर्षांपासूनच्या अवर्षणामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली असून, ती साडेचार मीटरवर पोहोचली आहे. परिणामी, जानेवारीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता तीव्रतेने जाणवण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १३७ गावात भूजलाचा बेसुमार उपसा वाढल्याने या भागात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहिरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील स्थितीही येत्या काळात बिकट बनणार आहे. दुसरीकडे देऊळगावराजा, लोणार, मेहकर आणि सिंदखेडराजा या घाटावरील चार तालुक्यात ही भूजल पातळी दोन मीटरपेक्षा अधिकने खाली गेल्यामुळे डिसेंबरअखेरच या भागात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता या भागात उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्हय़ाची गेल्या पाच वर्षांंची सरासरी भूजल पातळी ही ६.२१ मीटर आहे. त्या तुलनेत ऑक्टोबर २0१५ मध्ये १६७ निरीक्षण विहिरींच्या पाहणीनंतर सरासरी भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली आहे. वरकरणी असे दिसत असले तरी परतीचा पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पडला असला तरी नैसर्गिक पुनर्भरण या पावसात अत्यंत कमी झाल्याने आहे त्या पेक्षाही भूजल पातळी खोल असावी, अशी शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

*दोन तालुक्यात उपसा अधिक

घाटाखालील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यात भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील १३७ गावात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहीर, कूपनलिका, विंधन विहीर खोदण्यावर महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ नुसार बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रापैकी संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाणलोट क्षेत्रात उपसा बेसुमार वाढल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.

*२0 टक्केच पाणी

नैसर्गिकरीत्या पडणार्‍या पावसाच्या पाण्यापैकी एक लाख ९५१ हेक्टर मीटर पाणी जमिनीत मुरत आहे तर पाच हजार १५१ हेक्टर मीटर पाणी नैसर्गिकरीत्या वाहून जात आहे. त्या तुलनेत ६५ हजार ९३६ हेक्टर मीटर पाण्याचा उपसा जिल्ह्यात होत आहे. परिणामी, उरलेल्या २९ हजार ८६४ हेक्टर मीटर पाण्यापैकी केवळ ३0 टक्केच भूजलाचा वापर करता येण्यासारखा आहे. त्यापैकी १0 ते १५ टक्केच पाणी प्रत्यक्षात आपण उपसू शकत नाही.