शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

भूजल पातळी दीड मीटरने खालावली!

By admin | Updated: November 24, 2015 01:31 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपसा वाढला.

नीलेश जोशी / खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रामध्ये भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठय़ा प्रमाणावर वाढला असतानाच सलग दोन वर्षांपासूनच्या अवर्षणामुळे जिल्ह्याची भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली असून, ती साडेचार मीटरवर पोहोचली आहे. परिणामी, जानेवारीपासून जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता तीव्रतेने जाणवण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १३७ गावात भूजलाचा बेसुमार उपसा वाढल्याने या भागात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहिरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील स्थितीही येत्या काळात बिकट बनणार आहे. दुसरीकडे देऊळगावराजा, लोणार, मेहकर आणि सिंदखेडराजा या घाटावरील चार तालुक्यात ही भूजल पातळी दोन मीटरपेक्षा अधिकने खाली गेल्यामुळे डिसेंबरअखेरच या भागात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता या भागात उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्हय़ाची गेल्या पाच वर्षांंची सरासरी भूजल पातळी ही ६.२१ मीटर आहे. त्या तुलनेत ऑक्टोबर २0१५ मध्ये १६७ निरीक्षण विहिरींच्या पाहणीनंतर सरासरी भूजल पातळी ही १.६२ मीटरने खालावली आहे. वरकरणी असे दिसत असले तरी परतीचा पाऊस सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात पडला असला तरी नैसर्गिक पुनर्भरण या पावसात अत्यंत कमी झाल्याने आहे त्या पेक्षाही भूजल पातळी खोल असावी, अशी शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

*दोन तालुक्यात उपसा अधिक

घाटाखालील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यात भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. त्यामुळे या तालुक्यातील १३७ गावात ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विहीर, कूपनलिका, विंधन विहीर खोदण्यावर महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ नुसार बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील ५७ पाणलोट क्षेत्रापैकी संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाणलोट क्षेत्रात उपसा बेसुमार वाढल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.

*२0 टक्केच पाणी

नैसर्गिकरीत्या पडणार्‍या पावसाच्या पाण्यापैकी एक लाख ९५१ हेक्टर मीटर पाणी जमिनीत मुरत आहे तर पाच हजार १५१ हेक्टर मीटर पाणी नैसर्गिकरीत्या वाहून जात आहे. त्या तुलनेत ६५ हजार ९३६ हेक्टर मीटर पाण्याचा उपसा जिल्ह्यात होत आहे. परिणामी, उरलेल्या २९ हजार ८६४ हेक्टर मीटर पाण्यापैकी केवळ ३0 टक्केच भूजलाचा वापर करता येण्यासारखा आहे. त्यापैकी १0 ते १५ टक्केच पाणी प्रत्यक्षात आपण उपसू शकत नाही.