शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:39 IST

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.

ठळक मुद्देगाळ काढल्याने तलावातील जलसाठ्यात वाढ

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.२६ हजार लोकसंख्या असलेले साखरखेर्डा हे गाव आहे. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकर्यांना सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे.येथील पाणीटंचाईची समस्याही हे अभियान राविल्यामुळे आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. तसे या गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व सुद्धा आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुरविल्या जाते. गाव शिवारात ९० कामे उपक्रमातंर्गत मंजूर करण्यात आली होती तर ७९ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली.

शेतकर्यांचा मिळाला प्रतिसादसाखरखेर्डा गावच्या शिवारात अभियानातंर्गत सिमेंट नाला, बांधातील गाळ काढणे आणि खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात १७ बंधार्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींना जलसंजीवनी मिळाली. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला होता. १३ ठिकाणी नाला खोलीकरणाचीही कामे झाली आहे. तीनही तलावामधून दोन लाख ३० हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे वर्षभरात येथील विहीरींना चांगले पाणी आले. 

डाळींब शेतीकडे वळले शेतकरीया भागातील शेतकरी आता डाळीं शेतीकडे वळले आहेत. काही ठिकाणी फुलशेतीही सुरू झाली आहे. भूजल पातळीतही या भागात झालेल्या कामामध्ये पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी