शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:39 IST

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.

ठळक मुद्देगाळ काढल्याने तलावातील जलसाठ्यात वाढ

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.२६ हजार लोकसंख्या असलेले साखरखेर्डा हे गाव आहे. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकर्यांना सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे.येथील पाणीटंचाईची समस्याही हे अभियान राविल्यामुळे आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. तसे या गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व सुद्धा आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुरविल्या जाते. गाव शिवारात ९० कामे उपक्रमातंर्गत मंजूर करण्यात आली होती तर ७९ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली.

शेतकर्यांचा मिळाला प्रतिसादसाखरखेर्डा गावच्या शिवारात अभियानातंर्गत सिमेंट नाला, बांधातील गाळ काढणे आणि खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात १७ बंधार्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींना जलसंजीवनी मिळाली. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला होता. १३ ठिकाणी नाला खोलीकरणाचीही कामे झाली आहे. तीनही तलावामधून दोन लाख ३० हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे वर्षभरात येथील विहीरींना चांगले पाणी आले. 

डाळींब शेतीकडे वळले शेतकरीया भागातील शेतकरी आता डाळीं शेतीकडे वळले आहेत. काही ठिकाणी फुलशेतीही सुरू झाली आहे. भूजल पातळीतही या भागात झालेल्या कामामध्ये पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी