शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

अभिवादन अभियानाला खो!

By admin | Updated: July 6, 2015 01:50 IST

सौहार्दपूर्णतेच्या योजनेला राज्य परिवहन महामंडळाची केराची टोपली.

खामगाव : प्रवाशांच्या संख्येत वारंवार घट होत असल्यामुळे तोट्यात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी वर्षभरा पूर्वी प्रवासी अभिवादन अभियान सुरू करण्यात आले; मात्र नव्याची नवलाई संपल्यानंतर वाहकांकडून हा उपक्रम लगेच गुंडाळ्यात आल्याचे दिसून येते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला तोट्याचे ग्रहण लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ह्यहात दाखवा, बस थांबवाह्ण, ह्यप्रवासी सेवा अभियानह्ण, ह्यज्येष्ठांसाठी अर्धे तिकीट योजनाह्ण आणि आता वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेले ह्यप्रवासी अभिवादन अभियानह्ण यांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत बस स्थानकाहून एसटी सुटतेवेळी प्रवाशांना नमस्कार करून एसटी जात असलेल्या मार्गाची माहिती वाहकांना द्यावयाची होती. दरम्यान, या अभियानांतर्गत सुरुवातीच्या काळात प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली; मात्र गेल्या सहा-आठ महिन्यांपासून या उपक्रमाला एसटी महामंडळातील वाहकांकडून खो दिला जात असल्याचे दिसून येते.

*चालकांचीही अरेरावी !

       एसटी महामंडळातील अधिकारी, वाहकांसोबतच चालकही प्रवाशांना उद्धट वागणूक देत असल्याच्या घटना राज्यात विविध ठिकाणी समोर येत आहेत. गेल्या मार्च महिन्यात खामगाव आगाराच्या एका चालकाने शेगाव बस स्थानकावर विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रसंग घडला हो ता. पुढे सामंजस्याने हे प्रकरण मिटविण्यात आले असले तरी यामधून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाली होती.

*अधिका-यांचीही पाठ!

      महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वाहकांसोबतच चालकांनीही या अभियान वजा उपक्रमाकडे पाठ फिरविली आहे. राज्य परिवहन महामंडळाची संकल्पना कितीही चांगली असली तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे या योजनेचा इतर योजनांप्रमाणेच फज्जा उडाल्याचे चित्र आहे.