शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा बळकटीकरणाला ‘मूळपत्रिके’चे कोंदण!

By admin | Updated: May 16, 2016 01:26 IST

चिखली तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम.

सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा)गावच्या विकासाचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी व ग्रामपंचायतीचा कारभार पारदश्री व्हावा, यासह इतरही अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी गावपातळीवर ग्रामसभेला विशेष महत्त्व आहे. मात्र, ग्रामपातळीवर या ग्रामसभेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड अनास्था दिसून येते. अनेक गावांत ग्रामसभा होतच नाहीत, ज्या होतात त्या कागदोपत्नी होतात, त्यामध्ये ठरावही संमत होतात. ग्रामस्थांना त्याची पुसटसी कल्पनाही नसते. गावातील काही प्रतिष्ठित, सत्ताधारी एकित्रत येतात व त्यांच्या निर्णयांना ग्रामसभेचे निर्णय म्हणून नक्की करतात. तर ग्रामसभा घ्यायचा प्रयत्न केला तरी लोक जमतच नाहीत, त्यांचे महत्त्व त्यांना वाटत नाही, ही स्थिती गावपातळीवर सर्वदूर आहे. मात्र, हे चित्र बदलावे, ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे व प्रत्येक ग्रामसभेला ग्रामस्थांची १00 टक्के उपस्थिती लाभावी, या उदात्त हेतूने तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून, ग्रामसभेचे निमंत्रण देण्यासाठी चक्क मूळपत्रिका त्यांनी छापल्या आहेत.लग्न समारंभ असो अथवा सणवार सासरी नांदायला गेलेल्या लेकीला तसेच तिच्या सासरकडील मंडळींना सहकुटुंब आमंत्रण देणे व मुलीला माहेरी आणण्यासाठी आजही मुराळी परंपरा विशेषत: वर्‍हाडात जपल्या जाते. मात्र; काळ बदलला तसे या मुराळीचे स्वरूपही बदलले. पूर्वी साधे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकेसह शिदोरी व इतर मानपानाच्या प्रथा जोपासल्या जात होत्या. कालांतराने त्यात बदल झाला, बैलगाड्या कालबाहय़ झाल्या. शिदोरी प्रथा काही प्रमाणात कमी झाली. म्हणून अक्षतांचे पाकिटे व त्यासोबत जाण्या-येण्याचे भाडेही पाहुणे मंडळीने दिले जात होते. तो काळही मागे पडला आणि आता मुराळीची जागा घेतली आहे ती ह्यमूळपत्रिकेह्णने. एखाद्या घरात लग्नसमारंभाचा योग आल्यानंतर लगेच पत्रिका काढल्या जातात व त्या सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठीची धडपड सुरू होते. त्यातही निमत्रंण पाठवित असताना आप्तस्वकीय, जवळचे मित्न, नातेवाइकांना आवर्जून मूळपत्रिका दिल्या जातात. त्याचा परिणामही तसा सकारात्मक असतो. अमूक एका लग्नाची आपल्याला मूळपत्रिका दिली आहे, तेव्हा हे लग्न टाळणे शक्य नाही. अशी एक भावना प्रत्येकामध्ये निर्माण होते. ही सकारात्मक भावना गावाच्या विकासासाठी प्रत्येकाच्या मनात रूजावी व ग्रामविकासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ग्रामसभेला गावातील प्रत्येकाने सहकुटुंब उपस्थित राहावे; यासाठी तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, ग्रामसभेला नागरिकांची १00 टक्के उपस्थिती लाभावी, यासाठी चक्क ग्रामसभेचे निमंत्रण देणारी मूळपत्रिकाच त्यांनी काढली आहे. सुमारे ८00 लोकवस्तीचे मुंगसरी या गावाने सरपंच कल्पना गाडेकर यांच्या नेतृत्वात आदर्श ग्रामकडे वाटचाल चालविली आहे. तालुक्यातील पहिले हगणदरीमुक्त गाव म्हणूनही या गावाने लौकिक मिळविला आहे.