शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:40 IST

- सोहम घाडगे बुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा ...

- सोहम घाडगेबुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात आहे. दुसरीकडे बाजारपेठेत नवीन हरभरा, तूर दाखल होताच भाव घसरले आहेत. हमीभाव मिळत नसल्यामुळे हरभरा उत्पादकांना प्रतिक्ंिवटल एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. एकीकडे रासायनिक खते, कीटकनाशकांचे भाव वाढत असताना शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हरभºयाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत  दर मिळत होता. मात्र नवीन हरभरा दाखल होताच हरभºयाचे दर ३ हजार ते ३ हजार ७०० वर आले आहेत. त्यामुळे प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांनी दर घसरले आहेत. शासनाचा हमीभाव ४४०० रुपये आहे. हमीभावापेक्षा १  हजार ४००  रुपयांनी कमी दराने हरभरा विक्री होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी नुकसान होत आहे. आधीच दुष्काळामुळे या भागात शेतमालाचे उत्पादन घटले असून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे. यंदा दुष्काळाने सर्वच शेतमालाचे उत्पादन अत्यल्प झाल्याने दर चांगले राहतील, अशी शेतकºयांना अशा होती. परंतू त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. परिसरात हरभरा उत्पादक शेतकºयांची मोठी संख्या आहे. यंदा बहुतांश शेतकºयांना खरिपातून उत्पादन खर्चही हाती लागला नाही. त्यामुळे हरभºयावर शेतकºयांची मदार होती. शेतमालाचे दर स्थिर नसल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.  हरभºयाबरोबरच तुरीचेही दर चांगलेच घसरले आहेत. तुरीला सुरुवातीला ५ हजार ३०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तुरीला ४ हजार ते ४ हजार ९०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल मागे दरात घसरण झाली आहे. तुरीला हमीभाव ५ हजार ६७५ रुपये आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. 

 नाफेड बंद; शेतकरी त्रस्तबुलडाणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी व्यापारांना तूर विकत आहेत. व्यापाºयांकडून कमी दर मिळत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. बुलडाण्याचे केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे व्यापारी परिस्थितीचा गैर फायदा घेत आहेत. यामाध्यमातून  शेतकºयांची लूट होत केली जात आहे.  बुलडाणा येथे तूर, हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकाºयांकडे केली आहे. 

 असा आहे हमीभाव शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज आहे. शासनाच्या हमीभावाप्रमाणे हरभरा ४ हजार ४००, तूर ५ हजार ६७५, सोयाबीन ३ हजार ३९९, ज्वारी २ हजार ३४०, मका १ हजार ७००, उडीद ५ हजार ६००, मूग ६ हजार ९७५ असा दर आहे. मात्र व्यापाºयांकडे एवढा भाव मिळत नाही. पैशांची गरज असल्याने शेतकºयांना कमी भावात माल विकल्याशिवाय पर्याय राहत नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती