शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:40 IST

- सोहम घाडगे बुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा ...

- सोहम घाडगेबुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात आहे. दुसरीकडे बाजारपेठेत नवीन हरभरा, तूर दाखल होताच भाव घसरले आहेत. हमीभाव मिळत नसल्यामुळे हरभरा उत्पादकांना प्रतिक्ंिवटल एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. एकीकडे रासायनिक खते, कीटकनाशकांचे भाव वाढत असताना शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हरभºयाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत  दर मिळत होता. मात्र नवीन हरभरा दाखल होताच हरभºयाचे दर ३ हजार ते ३ हजार ७०० वर आले आहेत. त्यामुळे प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांनी दर घसरले आहेत. शासनाचा हमीभाव ४४०० रुपये आहे. हमीभावापेक्षा १  हजार ४००  रुपयांनी कमी दराने हरभरा विक्री होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी नुकसान होत आहे. आधीच दुष्काळामुळे या भागात शेतमालाचे उत्पादन घटले असून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे. यंदा दुष्काळाने सर्वच शेतमालाचे उत्पादन अत्यल्प झाल्याने दर चांगले राहतील, अशी शेतकºयांना अशा होती. परंतू त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. परिसरात हरभरा उत्पादक शेतकºयांची मोठी संख्या आहे. यंदा बहुतांश शेतकºयांना खरिपातून उत्पादन खर्चही हाती लागला नाही. त्यामुळे हरभºयावर शेतकºयांची मदार होती. शेतमालाचे दर स्थिर नसल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.  हरभºयाबरोबरच तुरीचेही दर चांगलेच घसरले आहेत. तुरीला सुरुवातीला ५ हजार ३०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तुरीला ४ हजार ते ४ हजार ९०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल मागे दरात घसरण झाली आहे. तुरीला हमीभाव ५ हजार ६७५ रुपये आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. 

 नाफेड बंद; शेतकरी त्रस्तबुलडाणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी व्यापारांना तूर विकत आहेत. व्यापाºयांकडून कमी दर मिळत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. बुलडाण्याचे केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे व्यापारी परिस्थितीचा गैर फायदा घेत आहेत. यामाध्यमातून  शेतकºयांची लूट होत केली जात आहे.  बुलडाणा येथे तूर, हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकाºयांकडे केली आहे. 

 असा आहे हमीभाव शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज आहे. शासनाच्या हमीभावाप्रमाणे हरभरा ४ हजार ४००, तूर ५ हजार ६७५, सोयाबीन ३ हजार ३९९, ज्वारी २ हजार ३४०, मका १ हजार ७००, उडीद ५ हजार ६००, मूग ६ हजार ९७५ असा दर आहे. मात्र व्यापाºयांकडे एवढा भाव मिळत नाही. पैशांची गरज असल्याने शेतकºयांना कमी भावात माल विकल्याशिवाय पर्याय राहत नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती