शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘तरूणाई’च्या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची साद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 17:01 IST

Khamgaon News : वृक्ष संवर्धनाच्या ‘खामगाव पॅटर्न’ची राज्यातील सर्वच नागरी भागात जोपासना केली जाणार असल्याचे दिसून येते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: प्राचीन, अतिप्राचीन वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरणाचा वसा स्थानिक तरूणाई फांऊडेशनच्यावतीने जोपासल्या जात आहे. ‘तरूणाई’ने २०१८ पासून सुरू केलेल्या उपक्रमाला आता  राज्य शासनाचीही साद मिळत आहे.  प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष कृती कार्यक्रम १० जून रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत जाहीर केला आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या ‘खामगाव पॅटर्न’ची राज्यातील सर्वच नागरी भागात जोपासना केली जाणार असल्याचे दिसून येते.राज्याच्या नागरी भागातील ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय १० जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  ही बैठक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये ‘हेरिटेज ट्री’ ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी,  वृक्षाचे वय, भरपाई वृक्षारोपण , मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, स्थानिक वृक्ष प्राधिकरणाची रचना, कर्तव्ये निश्चित करणे, वृक्ष गणना करणे, वृक्ष लागवडीसाठी सामुहिक जमीन निश्चित करणे, वृक्षांचे पुनर्रोपण,  वृक्ष संरक्षणासाठी पयार्यी विकल्पांचा शोध, वृक्ष उपकर आणि दंडाच्या तरतूद या ठळक बाबींचा समावेश आहे.

चौकट...अशी आहे ‘हेरिटेज ट्री’ ची  संकल्पना!५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे ‘हेरिटेज ट्री’ (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित केले जाईल. हे वृक्ष विशिष्ट प्रजातींचे असू शकतील. अशा प्रजातीं वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील. तसेच वृक्ष संवर्धन आणि संगोपनासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधीकरणाचीही स्थापना केली जाणार आहे. नगर परिषदेच्या बाबतीत वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष ‘मुख्याधिकारी’ राहतील.

 ‘तरूणाई’ची २०१८ पासून अंमलबजावणी!-खामगावचा ‘महावृक्ष’ या उपक्रमातंर्गत तरुणाई फांऊडेशनने ५ जून २०१८ पासून शहर आणि परिसरातील प्राचीन आणि अतिप्राचीन वृक्षाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. खामगाव शहरासह जिल्ह्यातील  वनप्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले. महावृक्षा जोपासणाºयांना ‘तरूणाई’ने गौरवान्वित केले. त्याच उपक्रमाला आता शासन स्तरावरून साद देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरी भागातील प्राचीन, अतिप्राचीन वृक्षांच्या संगोपनाचा, संवर्धनाचा आणि पर्यायाने निसर्ग संवर्धनाचा वसा जोपासल्या जाणार आहे.

 -  पूर्वजांनी लावलेल्या प्राचीन वृक्षांची जोपासना करणाºया परिवारांचा सत्कार तरूणाईच्यावतीने खामगावचा महावृक्ष उपक्रमातंर्गत सन २०१८ पासून केली जात आहे. या उप्रकमाला आता शासनाची साद लाभली असल्याचे समाधान आहे.- नारायण पिठोरेअध्यक्ष, तरूणाई फांऊडेशन, खामगाव

टॅग्स :khamgaonखामगावMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार